शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:34 IST

कर्नाटकात काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातच पराभव झाला आहे.

बेंगळुरु- कर्नाटकचे मावळत्या विधानसभेतील मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी कर्नाटक हे एकमेव मोठे आणि महत्त्वाचे राज्य शिल्लक राहिले होते. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती. सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमधून पराभव होणे काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक आहे. काँग्रेसने ही संपूर्ण निवडणूक सिद्धरामय्या यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दिला पणाला लावून निवडणूक लढविली होती. 

मुख्यमंत्री पदावरती असूनही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सिद्धरामय्या कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 1985 व 1989 साली दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. होळेनरसिंहपूर आणि सतनूर या दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला होता. 1985 साली ते दोन्ही जागांवर विजयी झाले आणि 1989 साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले. मात्र दोन्ही वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते.

1999 ते 2004 असे स्थिर सरकार देणाऱ्या आणि चांगले प्रशासक म्हणवल्या जाणाऱ्या एस. एम. कृष्णा यांना 2004 साली मतदारसंघ बदलावा लागला होता. त्यांनी मद्दूरऐवजी चामराजपेटमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस जनता दल सेक्युलरचे नेते आणि त्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एच.डी. कुमारस्वामीही दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. रमणगारा आणि चन्नपटट्ण अशा दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरलेले होते. 

 देवराज अर्स यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहाण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली तरिही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र याला संधी दिली आणि ते शेजारील चामुंडेश्वरी विधानसभा मतादरसंघात गेले आहेत. या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून गेले आणि दोन वेळा पराभूत झाले आहेत. 2006 साली त्यांनी येथून शेवटची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना फक्त 257 मते मिळाली होती. तसेच त्यांचे एकेकाळचे मित्र जीटी देवेगौडा जे वक्कलिंग समाजाची मते मिळवण्यासाठी मदत करायचे तसेच श्रीनिवास प्रसाद दलित मतासांठी मदत करायचे ते आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. बदामीमध्ये सिद्धरामय्या यांच्या कुरुबा समाजाची मते असली तरी लिंगायत आणि नायक समाजाची तेथे जवळपास 50 टक्के मते आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात नायक समाजाचे श्रीरामलू यांना उभे केले होते. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatakकर्नाटकsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेस