शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 10:14 IST

Karnataka Election 2023 :  येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निकालात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार की काँग्रेस आणि जेडीएसकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, यंदा कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा होणार का? अशी चर्चा रंगली आहे. तर या विधानसभा निवडणुकीत जनता दल सेक्युलर किंग मेकरची भूमिका बजावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निकालात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार की काँग्रेस आणि जेडीएसकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कर्नाटकचा निवडणूक इतिहास पाहता 2007 नंतर सलग दोन वेळा येथे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली नाही. गेल्या 26 वर्षात येथील जनतेने नेहमीच विरोधी पक्षांना सत्ता दिली आहे. अशा स्थितीत भाजपक्षासमोर इतिहासाची दिशा बदलणे, हे यावेळी आव्हान असणार आहे. मात्र, काँग्रेस आणि जेडीएसनेही या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे. 

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गेल्या निवडणुकीत 224 जागांपैकी जवळपास 75 टक्के म्हणजे 158 पेक्षा जास्त जागांवर भाजपची थेट लढत होती. भाजपला याचा फायदा झाला.  त्यामुळेच सरकार स्थापन करण्यात यश आले. 2004 पर्यंत कर्नाटकात काँग्रेसची सत्ता होती. तोपर्यंत याठिकाणी काँग्रेस थेट रिंगणात उतरत होती आणि त्याचा फायदाही झाला. 

मात्र, यानंतर भाजपनेही निवडणुकीच्या रिंगणात थेट उतरण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेस आणि जेडीएस सोबत भाजप प्रबळ दावेदार तर बनलेच पण सरकारमध्येही आले. 2007 पासून आतापर्यंत 4 वेळा भाजपचे सरकार बनले आहे. त्याचवेळी जेडीएस आणि काँग्रेसला प्रत्येकी एकदा सत्तेत बसण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे 2004 पासून कर्नाटकात कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलेले नाही. 2013 मध्ये काँग्रेसने 122 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळीही काँग्रेस बहुमतासाठी एका जागेने कमी पडली.

लिंगायत समाजाची मते नेहमीच ठरली आहेत निर्णायक कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते नेहमीच निर्णायक ठरली आहेत. 50 ते 60 जागांवर त्यांचा थेट हस्तक्षेप आहे आणि इथे त्यांची मते विजय-पराजय ठरवतात. अशा स्थितीत भाजपच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लिंगायत समाजावर काँग्रेस आणि जेडीएस विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास भाजपला मोठा धक्का बसू शकतो. मात्र , हे शक्य दिसत नाही. 

सध्या लिंगायत समाज भाजपसोबत दिसतो आणि याचे प्रमुख कारण बीएस येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई हे स्वतः या समाजातून आलेले आहेत. मात्र, नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर हेही याच समाजातून आलेले असले तरी ते त्यांच्या समाजाशी असलेली युती मतांमध्ये रूपांतरित करू शकतील की नाही, हे सांगता येणार नाही. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक