शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:44 IST

Madhya Pradesh political Crisis: काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये रंगलेले सत्तेचे नाटक आज १७ दिवसांनी संपले आहे. फ्लोअर टेस्टच्या आधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा राज्यापालांकडे सोपविला असून भाजपावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. भाजपाने लक्षात ठेवावे उद्या आणि परवाचा दिवसही उजाडणार आहे, लोकांच्या समोर सत्य येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाने २२ आमदारांना अपहृत केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.

गेल्या १५ महिन्यांमध्ये सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी गोशाळा बनविण्यात आल्या. नेमके हेच काम भाजपाला आवडले नाही. मध्य प्रदेशला भयमुक्त केल्याचेही भाजपाला आवडले नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, यामुळे भाजपाने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, असे आरोप त्यांनी सरकार पडण्यामागे भाजपावर केले आहेत.

गेल्या १५ महिन्यांत सरकारने पहिल्या टप्प्यात ३ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ७ लाख शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. तर तिसऱ्या टप्प्यात आणखी २ लाख शेतकऱ्यांन कर्जमाफी दिली. भाजपाने या शेतकऱ्यांना धोका दिला आहे, असा आरोपही कमलनाथांनी केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाcongressकाँग्रेस