शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:44 IST

Madhya Pradesh political Crisis: काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये रंगलेले सत्तेचे नाटक आज १७ दिवसांनी संपले आहे. फ्लोअर टेस्टच्या आधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा राज्यापालांकडे सोपविला असून भाजपावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. भाजपाने लक्षात ठेवावे उद्या आणि परवाचा दिवसही उजाडणार आहे, लोकांच्या समोर सत्य येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाने २२ आमदारांना अपहृत केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.

गेल्या १५ महिन्यांमध्ये सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी गोशाळा बनविण्यात आल्या. नेमके हेच काम भाजपाला आवडले नाही. मध्य प्रदेशला भयमुक्त केल्याचेही भाजपाला आवडले नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, यामुळे भाजपाने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, असे आरोप त्यांनी सरकार पडण्यामागे भाजपावर केले आहेत.

गेल्या १५ महिन्यांत सरकारने पहिल्या टप्प्यात ३ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ७ लाख शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. तर तिसऱ्या टप्प्यात आणखी २ लाख शेतकऱ्यांन कर्जमाफी दिली. भाजपाने या शेतकऱ्यांना धोका दिला आहे, असा आरोपही कमलनाथांनी केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाcongressकाँग्रेस