शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:44 IST

Madhya Pradesh political Crisis: काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये रंगलेले सत्तेचे नाटक आज १७ दिवसांनी संपले आहे. फ्लोअर टेस्टच्या आधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा राज्यापालांकडे सोपविला असून भाजपावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. भाजपाने लक्षात ठेवावे उद्या आणि परवाचा दिवसही उजाडणार आहे, लोकांच्या समोर सत्य येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाने २२ आमदारांना अपहृत केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.

गेल्या १५ महिन्यांमध्ये सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी गोशाळा बनविण्यात आल्या. नेमके हेच काम भाजपाला आवडले नाही. मध्य प्रदेशला भयमुक्त केल्याचेही भाजपाला आवडले नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, यामुळे भाजपाने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, असे आरोप त्यांनी सरकार पडण्यामागे भाजपावर केले आहेत.

गेल्या १५ महिन्यांत सरकारने पहिल्या टप्प्यात ३ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ७ लाख शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. तर तिसऱ्या टप्प्यात आणखी २ लाख शेतकऱ्यांन कर्जमाफी दिली. भाजपाने या शेतकऱ्यांना धोका दिला आहे, असा आरोपही कमलनाथांनी केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाcongressकाँग्रेस