शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:14 PM

काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली: काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी येथील लष्करी कारवायांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आली तरी लष्कराला कोणताही फरक पडेल, असे मला वाटत नाही. आमच्या कारवायांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील लष्करी कारवाया पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. तसेच केंद्र सरकारने रमझानमध्ये शस्त्रसंधी केल्यामुळेच लोकांना शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा करता आली. मात्र, ही शस्त्रसंधी अधिक काळ सुरु राहिली असती तर दहशतवाद्यांच्या कारवायांनी वेग आला असता. त्यामुळे रमजाननंतर शस्त्रसंधी मागे घेण्यात आली, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. काश्मीरमध्ये भाजपाने नुकताच पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. रमजानच्या काळातील शस्त्रसंधीचा मुद्दा युती तुटण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक होता. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतJammu Kashmirजम्मू-काश्मीर