शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची सामूहिक आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 8:50 AM

नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

झारखंड - नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सहा सदस्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. यातील 5 जणांनी गळफास घेतला तर एका व्यक्तीनं छतावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरातील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

(Burari Deaths : त्या 11 जणांच्या आत्महत्येमागे 5 आत्म्यांचा हात?)

बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण

दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. 1 जुलैला ही धक्कादायक घटना समोर आली होती. भाटिया कुटुंबातील 11 पैकी 10 सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर वयोवृद्ध महिलेचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत आढळला होता. नारायणी देवी (77 वर्ष) यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रतिभा (57 वर्ष) आणि त्यांची दोन मुलं भवनेश (50 वर्ष) आणि ललित (45 वर्ष) यांच्याशिवाय, भवनेश यांची पत्नी सविता (48 वर्ष) यांच्यासहीत त्यांची तीन मुलं मनिका (23 वर्ष), नीतू (25 वर्ष), धीरेंद्र (15 वर्ष) आणि ललित व त्याची  पत्नी टीना (42 वर्ष) ,त्यांचा मुलगा दुष्यंत (15 वर्ष) आणि प्रतिभा यांची मुलगी प्रियंका (33 वर्ष) मृतावस्थेत आढळले होते. 

भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही 30 जूनला घडलेल्या घटना कैद झाल्या आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबातील दोघी घरात टेबल घेऊन जाताना दिसत आहेत. भाटिया कुटुंबानं आधी घरात टेबल आणले. त्यानंतर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी समोरच्या दुकानातून वायर आणण्यात आल्या. ललित आणि भुवनेश भाटिया यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातू वायर आणल्या. याच वायरचा वापर गळफास घेताना करण्यात आला. विशेष म्हणजे भाटिया कुटुंबाशिवाय घरात कोणीही नव्हतं. त्यांच्या घरात कोणीही जबरदस्ती घुसत असल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं नाही. याशिवाय घरातील कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली, हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, अशा संदर्भाचा मजकूर आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाDeathमृत्यूFamilyपरिवार