शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 4:56 AM

मक्तेदारी, भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या मुळाशी हेच कलमच अमित शहा यांचा घणाघात

नवी दिल्ली : गेली ७० वर्षे कलम ३७०ला कवटाळून बसल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे वाटोळेच केले. पृथ्वीवरील हा स्वर्ग दहशतवादाच्या छायेखाली तीन कुटुंबांची मक्तेदारी बनून राहिला. भ्रष्टाचार, दहशतवादाच्या मुळाशी असलेले हे कलम रद्द केल्यानंतर, आता जम्मू-काश्मीर हे येत्या पाच वर्षांत देशातील सर्वात विकसित राज्य बनेल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत या विषयावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.कलम ३७० आणि ३५ अ हटविणे हाच काश्मीरच्या विकासाचा आणि तेथील समस्या सोडविण्याचा एकमेव उपाय असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले की, या कलमांनी राज्य मागासलेले ठेवले. येथे उद्योग, पर्यटनाचा विकास होऊ शकला नाही. कलम ३७० मुळेच रक्तपात होऊन ४१ हजार ४०० जणांचे बळी गेले. आमचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांना प्राण गमवावे लागले. केंद्र सरकारने राज्यांच्या हितासाठी केलेले कायदे तेथे ३७० मुळेच लागू होऊ न शकल्याने राज्याचे नुकसानच झाले. आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत.जम्मू-काश्मीरमधील उद्योग, व्यवसायही तीन कुटुंबांच्याच हाती आजही आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे होऊ दिल्या नाहीत. लोकशाही खाली झिरपू दिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य ठिकाणी ओबीसी, दलित, आदिवासींना आरक्षण मिळू दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका करविल्या. जे नेते काश्मीरच्या चिंतेची आवई उठवित आहेत, त्यांची मुले लंडन, अमेरिकेत शिकतात. आता कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरची संस्कृती नष्ट होईल, अशी ओरड करणाऱ्यांनी अन्य राज्यांत हे कलम नसताना तेथील संस्कृती नष्ट झाली आहे का, असा सवाल अमित शहा यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यानेच आज कलम ३७० आणि ३५अ रद्द केले जात आहे. काँग्रेसने ती कधीही दाखविली नाही. कलम ३७०च्या आड पाकिस्तानने नेहमीच फुटीरतावाद्यांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न केले. धर्म, राजकारणाच्या पलीकडे आम्ही काश्मीर समस्येकडे पाहतो. कलम ३७० हटावे ही देशातील लाखो-करोडो लोकांची भावना आहे आणि आजच्या निर्णयाने त्याचा आदरच झाला आहे, असे अमित शहा म्हणाले.निर्बंध लवकरच हटवूजम्मू-काश्मीरमध्ये काही निर्बंध सध्या आणण्यात आले आहेत आणि ते सद्यस्थितीत योग्यही आहेत, असे सांगून अमित शहा यांनी योग्य वेळी ते निर्बंध हटविले जातील, अशी ग्वाही सभागृहाला दिली.नेहरूंना केले लक्ष्यभारतातील सहाशे संस्थाने भारतात विलीन झाली. त्याचे मोठे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते. ही संस्थाने असलेल्या ठिकाणी कलम ३७० न आणता त्यांना भारतात आणले गेले. फक्त काश्मीरचा विषय हा पंडित जवाहरलाल नेहरू हाताळत होते आणि तिथे हे कलम आणले गेले, या शब्दात अमित शहा यांनी नेहरूंना टीकेचे लक्ष्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Amit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू