शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 18:12 IST

जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी एक भीषण अपघात घडला आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंची बस यूपीमधील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोडीकडे जात होती. यावेळी चोकी चोरा परिसरातील तंगली वळणावर हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचे वाहतूक आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. तसेच, राजिंदर सिंग तारा म्हणाले, "बस शिव खोडीकडे जात होती. इथले वळण अगदी सामान्य आहे. इथे काही अडचण आली नसावी, पण कदाचित ड्रायव्हरला झोप आली असावी. वळण्याऐवजी बस सरळ गेली आणि नंतर खोल दरीत कोसळली."

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. जम्मूमधील अखनूरजवळ झालेल्या बस अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे की, "जम्मू येथील अखनूरमध्ये झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेतील मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो."

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघात