शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 18:12 IST

जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी एक भीषण अपघात घडला आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंची बस यूपीमधील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोडीकडे जात होती. यावेळी चोकी चोरा परिसरातील तंगली वळणावर हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचे वाहतूक आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. तसेच, राजिंदर सिंग तारा म्हणाले, "बस शिव खोडीकडे जात होती. इथले वळण अगदी सामान्य आहे. इथे काही अडचण आली नसावी, पण कदाचित ड्रायव्हरला झोप आली असावी. वळण्याऐवजी बस सरळ गेली आणि नंतर खोल दरीत कोसळली."

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. जम्मूमधील अखनूरजवळ झालेल्या बस अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे की, "जम्मू येथील अखनूरमध्ये झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेतील मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो."

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघात