शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 15:18 IST

Jairam Ramesh On PM Modi : पीएम मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच दिवशी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा 17वा हप्ता देण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली.

Jairam Ramesh On PM Modi :नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.7) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी(दि.10) नरेंद्र मोदींनी कार्यलयात जाऊन पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली. ही फाईल शेतकऱ्यांशी संबंधित असून, याद्वारे किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या पहिल्या निर्णयावर काँग्रेसकडून टीका केली जात आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे पीएम मोदींवर टीका केली. ते लिहितात, 'पंतप्रधानांचे हेडलाईन व्यवस्थापन आणि पीआर टीम तिसऱ्या टर्मच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा 17वा हप्ता देण्यासाठी पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या' PM किसान निधीचा 16 वा हप्ता जानेवारी 2024 मध्ये मिळणार होता, परंतु पंतप्रधानांना निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी त्यात एक महिन्याचा उशीर केला. यानंतर 17 वा हप्ता एप्रिल/मे 2024 मध्ये मिळणार होता, परंतु आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यास विलंब झाला.'

'आता पंतप्रधानांनी या फाईलवर स्वाक्षरी करुन कोणावरही मोठे उपकार केलेले नाहीत. हे त्यांच्या सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे न्याय्य हक्क आहेत. दैनंदिन आणि नित्याच्या प्रशासकीय निर्णयांना मोठ्या स्वरुपात दाखवण्याची त्यांना सवय लागली आहे. वरवर पाहता, तो अजूनही स्वत: ला अजूनही दैवी शक्ती मानतात. जर त्यांना खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताची काळजी असेल, तर त्यांनी या पाच गोष्टी केल्या असत्या. 1. योग्य किंमत - स्वामीनाथन सूत्रावर आधारित MSP ची कायदेशीर हमी. 2. कर्जमाफी - कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थायी आयोग. 3. विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण - पीक नुकसान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातात. 4. योग्य आयात- निर्यात धोरण - शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून नवीन आयात-निर्यात धोरण करणे,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल