शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:50 IST

भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देअमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीकेचे बाण सोडले. 'मिशन शक्ती'च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल, अशी माहिती तपन मिश्रा यांनी दिली.

जगातील फक्त तीन देशांनाच जमलेली अँटी सॅटेलाइट मिसाईलची यशस्वी चाचणी करून भारतानं आपली 'शक्ती' दाखवून दिली आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या या पराक्रमामुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे. चिनी ड्रॅगनही बिथरला आहे. ही चाचणी कशी चुकीची होती, हे भासवण्याचा आपले 'शेजारी' प्रयत्न करताहेत. अशातच, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीकेचे बाण सोडले. 'भयंकर घटना' असा भारताच्या चाचणीचा उल्लेख केला. त्याला इस्रोनं जशास तसं उत्तर दिलंय. अंतराळातील कचऱ्यावरून भारताचा उपदेश करणाऱ्या नासाचाइस्रोनं जवळपास कचराच करून टाकलाय. 

'मिशन शक्ती' फत्ते... आता पुढे काय?

भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झालाय. भारताने पाडलेल्या उपग्रहाचे सुमारे ६० तुकडे आतापर्यंत सापडले आहेत. त्यापैकी २४ तुकडे आयएसएसच्या कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या बिदूच्या बाहेर सापडले आहेत. अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असा शेरा नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन यांनी मारला होता. त्यामुळे भारताचं खरंच चुकलंय का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, इस्रोनं लगेचच त्याचं निरसन केलं आहे. देशाची मान खाली जाईल असं कुठलंही काम आपण केलं नसल्याचंही इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. 

'मिशन शक्ती'च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल, अशी माहिती तपन मिश्रा यांनी दिली. बऱ्याचदा लग्नात आपले काही खास मित्रही जेवणाला नावं ठेवतात. आपण जेव्हा काही वेगळं काम करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हार घातले जात नाहीत. हा जीवनाचा भागच आहे, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. परंतु, तो कचरा जाळून नष्ट करण्यास पुरेसा आहे, असं त्यांनी नमूद केलं.  

प्रचंड राजकीय इच्छाशक्तीशिवाय शक्य नव्हतं 'मिशन शक्ती'

तपन मिश्रा हे अहमदाबादमधील स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटरचे माजी संचालक आहेत. नासाने दिलेल्या इशाऱ्याबाबत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी 'मिशन शक्ती'चं यश उलगडून सांगितलं. 

चीनने ८०० किलोमीटर उंचीवर अँटी सॅटेलाइट टेस्ट केली होती. तिथे हवेचा दाब जवळपास नसतोच. त्यामुळे या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा, पाडलेल्या उपग्रहाचे ३००० तुकडे अजूनही अंतराळात तरंगत आहेत. तसा प्रकार होऊ नये यादृष्टीने भारताने पूर्ण काळजी घेतल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.

 

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीisroइस्रोNASAनासा