भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 20:09 IST2026-03-16T20:09:18+5:302026-03-16T20:09:47+5:30
Iran Israel America War: डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज मार्ग खुला ठेवण्यासाठी अनेक देशांना त्यांच्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले आहे.

भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
Iran Israel America War: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीत जहाजांची सुरक्षा करण्यासाठी युद्धनौका पाठवण्याबाबत भारताने अमेरिकेसोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा केलेली नाही, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (16 मार्च 2026) दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज मार्ग खुला ठेवण्यासाठी अनेक देशांना त्यांच्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले होते. मात्र या संदर्भात भारतासोबत कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नसल्याचे भारताने सांगितले आहे.
ट्रम्प यांनी अनेक देशांना केली होती अपील
इराणने होर्मुज सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर ट्रम्प यांनी सहयोगी देशांना या महत्त्वाच्या समुद्री मार्गाच्या सुरक्षेसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांनी युद्धनौका पाठवून सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र अद्याप कोणत्याही देशाने या आवाहनाला प्रतिसाद देत युद्धनौका पाठवण्याची घोषणा केलेली नाही.
Watch LIVE 📡
— PIB India (@PIB_India) March 16, 2026
Inter-Ministerial Briefing on Recent Developments in West Asia
📍National Media Centre, New Delhi
🕔 3 PM
Watch on #PIB's 📺
➡️Facebook: https://t.co/ykJcYlNrjj
➡️YouTube: https://t.co/gk6DrS5xoFhttps://t.co/NmiQCNFwEG
भारताची भूमिका काय?
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, या मुद्द्यावर विविध देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती भारताला आहे. मात्र, आतापर्यंत या विषयावर भारत आणि अमेरिकेदरम्यान कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. भारत या विषयावर विविध संबंधित देशांशी संवाद कायम ठेवणार आहे.
इराणसोबतच्या संबंधांमुळे भारतीय जहाजांना मार्ग
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, होर्मुज मार्गातून भारतीय ध्वज असलेल्या जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणसोबत कोणताही विशेष करार करण्यात आलेला नाही. त्यांच्या मते, भारत आणि इराण यांच्यातील चांगल्या संबंधांमुळे जहाजांच्या सुरक्षित आवागमनासाठी सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.