शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Inflation: इंडोनेशियात एक लीटर पाम तेलाची किंमत २२ हजार रुपयांवर, भारतावरही होणार मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:00 IST

Inflation: इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

जाकार्ता - इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मार्चमध्ये एक लीटल ब्रँडेड रिफाईंड पाम तेलाची किंमत ही २२ हजार इंडोनेशियन रुपये एवढी झाली आहे. गतवर्षी हीच किंमत १४ हजार रुपयांपर्यंत होती.

इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या पाम तेलाच्या किमतीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहे. तसेच भारतावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया जगातील सर्व देशांना सीपीओची निर्यात करतो. त्यामुळे आता इतर वनस्पती तेलाच्या किमतीवरही होत आहे. कारण वनस्पती तेल प्रत्येक घरातील भोजनातील महत्त्वाचा भाग आहे.

२०२० मध्ये इंडोनेशियात ४.४८ कोटी टन एवढ्या सीपीओचं उत्पादन झालं. यातील ६० टक्के खासगी कंपन्यांनी केलं. तर ३४ टक्के शेतकरी आणि ६ टक्के सरकारी कंपन्यांनी उत्पादन केलं. देशातील सीपीओचं संपूर्ण उत्पादन खासगी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांकडे आहे. या खासगी व्यावसायिकांनीच जागतिक परिस्थिती पाहून देशात पामतेलाचं संकट निर्माण केलं. देशातील व्यापारमंत्री मोहम्मद लुफ्ती यांनी या परिस्थितीसाठी तेलमाफियांना जबाबदार धरले होते.

रशिया-युक्रेनमधील युद्ध आणि अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्षानेही या पाम तेलाच्या संकटाला हातभार लावला.  रशिया आणि युक्रेनमधून ७५ टक्के सूर्यफुलाच्या तेलाचा पुरवठा होतो. मात्र तणावामुळे त्यावर परिणाम झाला.  तसेच भारत आणि ब्राझीलसारख्या देशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने सीपीओच्या मागणीत प्रचंड वाढ झाली.

दरम्यान, इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या किमतींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रँडेड रिफाईंड पाम तेलाची किंमत १४ हजार रुपये निश्चित केले. लोकांना एकावेळी २ लिटर तेल खरेदी करता येईल, असा नियम केला. तसेच निर्यातदारांना ३० टक्के उत्पन्न देशांतर्गत बाजारात विकणे अनिवार्य केले. मात्र खासगी व्यावसायिकांनी याला विरोध केला. आता ते घरगुती बाजारात आणि निर्यातीसाठीही पुरवठा करत नाही आहेत.

इंडोनेशियामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार भारत आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताने जानेवारीमध्ये १२.७० लाख टन खाद्य तेलाची आयात केली होती. गेल्या वर्षी जानेवारीच्या १०.९६ लाख टनच्या तुलनेत १६ टक्के अधिक राहिली. लक्षणीय बाब म्हणजे भारतातील खाद्य तेलाच्या आयातीमधील ६० टक्के हिस्सा हा पाम तेलाचा असतो.

दरम्यान, इंडोनेशियात पाम तेलाचे संकट निर्माण झाल्यानंतर भारतामध्येही खाद्य तेलाच्या किमतींमध्ये २५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी सरकारने काही पर्यायी उपाय केले आहेत. पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. तसेच सूर्यफुलाच्या तेलाची आयात वाढवण्यात आली आहे. भारताने हल्लीच रशियाकडून ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाची आयात केली आहे.  

टॅग्स :InflationमहागाईIndonesiaइंडोनेशियाIndiaभारत