शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Inflation: इंडोनेशियात एक लीटर पाम तेलाची किंमत २२ हजार रुपयांवर, भारतावरही होणार मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:00 IST

Inflation: इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

जाकार्ता - इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मार्चमध्ये एक लीटल ब्रँडेड रिफाईंड पाम तेलाची किंमत ही २२ हजार इंडोनेशियन रुपये एवढी झाली आहे. गतवर्षी हीच किंमत १४ हजार रुपयांपर्यंत होती.

इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या पाम तेलाच्या किमतीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहे. तसेच भारतावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया जगातील सर्व देशांना सीपीओची निर्यात करतो. त्यामुळे आता इतर वनस्पती तेलाच्या किमतीवरही होत आहे. कारण वनस्पती तेल प्रत्येक घरातील भोजनातील महत्त्वाचा भाग आहे.

२०२० मध्ये इंडोनेशियात ४.४८ कोटी टन एवढ्या सीपीओचं उत्पादन झालं. यातील ६० टक्के खासगी कंपन्यांनी केलं. तर ३४ टक्के शेतकरी आणि ६ टक्के सरकारी कंपन्यांनी उत्पादन केलं. देशातील सीपीओचं संपूर्ण उत्पादन खासगी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांकडे आहे. या खासगी व्यावसायिकांनीच जागतिक परिस्थिती पाहून देशात पामतेलाचं संकट निर्माण केलं. देशातील व्यापारमंत्री मोहम्मद लुफ्ती यांनी या परिस्थितीसाठी तेलमाफियांना जबाबदार धरले होते.

रशिया-युक्रेनमधील युद्ध आणि अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्षानेही या पाम तेलाच्या संकटाला हातभार लावला.  रशिया आणि युक्रेनमधून ७५ टक्के सूर्यफुलाच्या तेलाचा पुरवठा होतो. मात्र तणावामुळे त्यावर परिणाम झाला.  तसेच भारत आणि ब्राझीलसारख्या देशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने सीपीओच्या मागणीत प्रचंड वाढ झाली.

दरम्यान, इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या किमतींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रँडेड रिफाईंड पाम तेलाची किंमत १४ हजार रुपये निश्चित केले. लोकांना एकावेळी २ लिटर तेल खरेदी करता येईल, असा नियम केला. तसेच निर्यातदारांना ३० टक्के उत्पन्न देशांतर्गत बाजारात विकणे अनिवार्य केले. मात्र खासगी व्यावसायिकांनी याला विरोध केला. आता ते घरगुती बाजारात आणि निर्यातीसाठीही पुरवठा करत नाही आहेत.

इंडोनेशियामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार भारत आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताने जानेवारीमध्ये १२.७० लाख टन खाद्य तेलाची आयात केली होती. गेल्या वर्षी जानेवारीच्या १०.९६ लाख टनच्या तुलनेत १६ टक्के अधिक राहिली. लक्षणीय बाब म्हणजे भारतातील खाद्य तेलाच्या आयातीमधील ६० टक्के हिस्सा हा पाम तेलाचा असतो.

दरम्यान, इंडोनेशियात पाम तेलाचे संकट निर्माण झाल्यानंतर भारतामध्येही खाद्य तेलाच्या किमतींमध्ये २५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी सरकारने काही पर्यायी उपाय केले आहेत. पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. तसेच सूर्यफुलाच्या तेलाची आयात वाढवण्यात आली आहे. भारताने हल्लीच रशियाकडून ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाची आयात केली आहे.  

टॅग्स :InflationमहागाईIndonesiaइंडोनेशियाIndiaभारत