शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

३०० जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याचा संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक; केंद्र सरकारने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 09:21 IST

जगात १० जानेवारी रोजी ३१.५९ लाख कोरोनाबाधित आढळले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. १

देशामध्ये ३०० जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याचा संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात या राज्यांतील कोरोना स्थिती चिंतेचा विषय बनली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गात ३० डिसेंबर रोजी १.१ टक्के वाढ झाली होती. त्याचे प्रमाण बुधवारी ११.०५ टक्के झाले आहे. 

जगात १० जानेवारी रोजी ३१.५९ लाख कोरोनाबाधित आढळले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. १९ राज्यांमध्ये प्रत्येकी दहा हजारांहून सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील कोरोना स्थिती चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे पात्र गटातील सर्व व्यक्तीनी प्राधान्याने लस घेतली पाहिजे व प्रतिबंधक उपाय पाळले पाहिजेत, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. ‘ओमायक्राॅन’चा संसर्ग म्हणजे साधा ताप व खोकला नव्हे. या संसर्गाकडे अधिक गंभीरपणे पाहायला हवे व डॉक्टरांकडून नीट उपचार करून घ्यावेत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. सर्वांनी मास्क वापरावा व शारीरिक अंतर राखावे, असेही त्यांनी सांगितले.

स्थिती सुधारल्यास निर्बंध शिथिल होतील -आरोग्यमंत्री

दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असून या स्थितीमध्ये आणखी सुधारणा झाल्यास निर्बंध शिथील करण्यात येतील, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या रविवारी दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या २२ हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर तेवढा आकडा दिल्लीने ओलांडला नाही. सोमवारी १९१६६ तर मंगळवारी २१,२५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. ही संख्या वाढत नसल्याने बाधितांच्या वाढीचा वेग स्थिर झाल्याचा दावा जैन यांनी केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत