शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:00 IST

अव्यानच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आणखी चार मृत्यूंची पुष्टी झाली, ज्यात एका निष्पाप बाळाचा आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. शेकडो लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. अव्यान असं या पाच वर्षांच्या बाळाचं नाव आहे. दुधात नळाचं पाणी मिसळून पाजल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.

अव्यानच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आजीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही गरीब आहोत. माझा मुलगा नोकरी करतो. त्यावरच घर चालतं. आम्ही कोणावरही आरोप करू शकत नाही. देवाने आनंद दिला होता आणि पुन्हा हिरावून घेतला. अव्यानची आई वारंवार बेशुद्ध पडत आहे" अशी माहिती आजीने दिली.

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

अव्यानचे वडील सुनील साहू एका खासगी कुरिअर कंपनीत काम करतात. दहा वर्षांच्या नवसानंतर ८ जुलै रोजी मुलाचा जन्म झाला होता. बाळ पूर्णपणे निरोगी होतं. कोणताही आजार नव्हता. पण दोन दिवसांपूर्वी त्याला ताप आणि जुलाब सुरू झाले. डॉक्टरांना दाखवण्यात आलं, औषधे दिली गेली, पण प्रकृती खालावत गेली. रविवारी रात्री प्रकृती अत्यंत गंभीर झाली. सोमवारी सकाळी रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

सुनील सांगतात की, "पाणी दूषित आहे हे त्यांना कोणीही सांगितलं नाही. ते स्वतः पाणी गाळून घ्यायचे, त्यात तुरटी टाकायचे. संपूर्ण परिसर तेच पाणी पीत होता. आईला दूध येत नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या दुधात पाणी मिसळून बाळाला द्यायचो. डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही हेच नर्मदा नदीचे पाणी दुधात मिसळून द्यायचो. हे पाणी इतके दूषित असेल याची आम्हाला कल्पना नव्हती.

दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा

"बाळाला दोन दिवसांत अचानक ६-७ वेळा जुलाब झाले. आम्ही औषधही दिले. सकाळी अचानक प्रकृती बिघडली. हे पाण्यामुळे झालं आहे हे आम्हाला माहितही नव्हतं, इथल्या लोकांनी सांगितल्यावर आम्हाला सत्य समजलं." दूषित पाण्यामुळे आतापर्यंत शेकडो जण आजारी पडले आहेत, ज्यांना उलट्या-जुलाब आणि पोटाशी संबंधित तक्रारी आहेत. यापैकी आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Infant dies from contaminated water after 10 years of prayers.

Web Summary : An infant in Indore died after drinking contaminated water mixed with milk. The parents, who had the child after 10 years of prayers, are devastated. Several others have also died or fallen ill in the area due to the contaminated water supply.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmilkदूधWaterपाणीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल