शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

शाब्बास पठ्ठ्यांनो! पँगौंग तलावानजीक ‘Strategic Height’वर भारताचा कब्जा; चीनला जबरदस्त दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 08:03 IST

एलएसीमधील तणावपूर्ण वातावरण पाहता भारतीय सैन्याची विकास रेजिमेंट बटालियन उत्तराखंड येथून पँगौंग तलावाच्या दक्षिणेकडच्या भागात तैनात करण्यात आली होती.

ठळक मुद्देपँगौंगजवळील ही उंच जागा बळकावण्यासाठी चीनची होता डावभारतीय सैन्याच्या विकास रेजिमेंट बटालियनच्या जवानांनी ठोकला तळही जागा आमच्या हद्दीत येत असल्याचा चीनचा खोटा दावा

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आहे. चीनी सैन्य त्यांच्या कुरापती कमी करण्यास तयार नाही, त्याला भारतीय सैन्यानेही चोख उत्तर दिले आहे. पूर्व लडाख प्रदेशातील पँगौंग तलावाजवळ चीनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या विश्वासघातकी डावाला भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसीमधील तणावपूर्ण वातावरण पाहता भारतीय सैन्याची विकास रेजिमेंट बटालियन उत्तराखंड येथून पँगौंग तलावाच्या दक्षिणेकडच्या भागात तैनात करण्यात आली होती. या बटालियनने वास्तविक नियंत्रण रेषेवरील(LAC) ज्याठिकाणी भारतीय क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते, तेथील एका उंच पठाराच्या जागेवर कब्जा केला आहे.

चीनचा असा दावा आहे की, हे क्षेत्र त्यांच्या हद्दीत आहे. ही जागा बळकावण्यासाठी चीनची करडी नजर होती. कारण या क्षेत्रावर कब्जा करणाऱ्याला तलाव आणि त्याच्या आसपासच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यात रणनीतीनुसार फायदा होऊ शकतो. चीनच्या या नियोजनाची माहिती भारतीय लष्कराला होती. अशा परिस्थितीत चीनकडून कोणतेही पाऊल उचलण्याआधी भारतीय लष्कराकडून सैनिकांची एक तुकडी याठिकाणी तैनात करावी असा निर्णय घेण्यात आला. सीमेवरील विवादाचा तोडगा काढण्यासाठी ब्रिगेडच्या कमांडर स्तरावरील बैठकी यापूर्वीच चुशुल आणि मोल्दो येथे घेण्यात आल्या आहेत, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.

भारताकडून ठाकुंगजवळील भूदलाने लढाऊ वाहने व टाक्यांसह शस्त्रे या उंच पठाराजवळ नेण्यात आली आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांमध्ये भारतीय अधिकारी तसेच विकास रेजिमेंट अंतर्गत काम करणाऱ्या तिबेटींचाही समावेश आहे.

नेमके काय झाले?

पँगौंग सो सरोवरात स्वहद्दीत चिनी सैनिकांनी तळ ठोकला आहे. पूर्वस्थितीनुसार आपल्या क्षेत्रात नियंत्रणरेषेच्या कक्षेत थांबण्याची भारताची मागणी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारताने हीच मागणी कायम ठेवली. चीननेही वेळोवेळी त्यास सहमती दर्शवली. राजनैतिक, लष्कर, परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत मागे हटण्याची तयारी दाखवली. संपूर्णपणे स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय चर्चा निष्फळ ठरेल, असे भारताने वारंवार बजावले.

२९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते ३० ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी बांधकाम आरंभले. साधारण ५०० सैनिक होते, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जवानांनी त्यास विरोध केला. शक्तिप्रदर्शन केले. शारीरिक इजा दोन्ही बाजूंनी कुणासही झाली नाही. जवानांनी मानवी भिंत तयार केली व युद्धस्थितीतील कवायती केल्याचा दावा सूत्रांनी केला. ड्रॅगनच्या कावेबाजपणाचा अंदाज असल्याने जवान सज्ज होते. त्यामुळे चिनी सैनिकांना मागे हटावे लागले.

भारताने गेल्या दोन महिन्यांमध्ये ड्रॅगनची दुखरी नस दाबली आहे. चिनी मालावर अप्रत्यक्ष बहिष्कार, शेजारील राष्ट्रांशी व्यापारविषयक करारावर निर्बंध लावताना भारताने चीनला वेळोवेळी समज दिली. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख, भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनला वेगवेगळ्या शब्दांत भारताचा इरादा सांगितला. चीनने आतापर्यंत वेळकाढूपणा कायम ठेवला आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनladakhलडाख