शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

२०२७ मध्ये 'चिनी कम'; भारत चीनला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:19 PM

संयुक्त राष्ट्राकडून अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली: येत्या तीन दशकांमध्ये भारत आणि नायजेरियाची लोकसंख्या अतिशय वेगानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रानं अहवालात म्हटलं आहे. पुढील तीन दशकांमध्ये भारताची लोकसंख्या २७ कोटी ३० लाखांनी वाढेल. तर याच काळात नायजेरियाच्या लोकसंख्येत २० कोटींची भर पडेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रानं जागतिक लोकसंख्येबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून पहिल्या स्थानावर असेल, असं अहवाल सांगतो. पुढील तीन दशकांमध्ये जगाची लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, असा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज इतकी असून २०५० पर्यंत ती ९.७ अब्जांवर जाऊन पोहोचेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात आहे. सध्या भारतातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या वेगानं वाढेल, असं विश्लेषण अहवालात करण्यात आलं आहे. भारत आणि नायजेरियामुळे जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतातील महिलांनी सरासरी १ किंवा २ मुलांना जन्म दिला तरीही लोकसंख्या वेगानं वाढेल. नायजेरियातील एक महिला सरासरी पाच मुलांना जन्म देते. त्यामुळे नायजेरियाची लोकसंख्या येत्या तीन दशकांमध्ये झपाट्यानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.   

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतchinaचीन