Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:07 AM2021-08-07T10:07:27+5:302021-08-07T10:11:24+5:30

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

india reports 38 628 new corona cases and 617 deaths in last 24 hours | Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदगेल्या २४ तासांत देशभरात ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्तआतापर्यंत एकूण ५० कोटी १० लाख ०९ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (india reports 38 628 new corona cases and 617 deaths in last 24 hours) 

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..."

केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३८ हजार ६२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ४ लाख २७ हजार ३७१ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ०३ कोटी १० लाख ५५ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४ लाख १२ हजार १५३ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ५० कोटी १० लाख ०९ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात ५ हजार ५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार ८५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात एकूण ६१ लाख ३० हजार १३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. तर, मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. 

अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात ३०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १४ हजार १६६ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. मुंबईत ४ हजार ३४५ रुग्ण सक्रिय असून, रुग्णदुपटीचा कालावधी १ हजार ६३१ दिवसांवर पोहोचला आहे. 
 

Web Title: india reports 38 628 new corona cases and 617 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.