शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:12 PM

तीन वर्षांत टपाल खात्याच्या तोट्यात 150 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली: टपाल खात्यानं तोट्याच्या बाबतीत बीएसएनएल, एअर इंडियाला मागे टाकलं आहे. 2018-19 मध्ये टपाल खात्याचा तोटा 15 हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये टपाल खात्याचा तोटा 150 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे आता भारतीय पोस्ट ही सर्वाधिक तोट्यात असलेली सरकारी कंपनी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अन्य भत्ते यांच्यावर होणाऱ्या खर्चामुळे टपाल खातं तोट्यात असल्याचं सांगितलं जात आहे. वेतन आणि भत्त्यांवर पोस्टाला दरवर्षी आपल्या महसूलापैकी 90 टक्के रक्कम खर्च करावे लागतात. पोस्ट खात्यानंतर बीएसएनएलचा तोटा सर्वाधिक आहे. 2018-19 मध्ये बीएसएनएल कंपनीला 7 हजार 500 कोटींचा तोटा झाला. तर 2017-18 मध्ये एअर इंडियाला 5,337 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पोस्ट खात्याला 2018-19 मध्ये 18 हजार कोटींचा महसूल मिळाला. यातील 16,620 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्त्यावर खर्च झाले. याशिवाय बीएसएनएलला वर्षाकाठी 9,782 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर खर्च करावे लागतात. बीएसएनएल दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांवर 26,400 कोटी रुपये खर्च करतं. 2020 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांवर 17,451 कोटी रुपये आणि निवृत्ती वेतनावर 10,271 कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. या काळात कंपनीचं उत्पन्न 19,203 कोटी रुपये असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बीएसएनएलचा पाय आणखी खोलात जाणार आहे.  

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसBSNLबीएसएनएलAir Indiaएअर इंडिया