शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:19 IST

जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जम्मू - पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून १०० दहशतवाद्यांना ठार केले. भारताच्या या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी मिसाईल, ड्रोन हल्ले भारताने उधळले. परंतु काही ठिकाणी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घरे, दुकाने पडली आहेत. खासकरून जम्मू काश्मीरात नागरी वस्तीत हल्ले केले गेलेत. सैन्य कारवाईत बऱ्याचदा दहशतवादी लपण्यासाठी सर्वसामान्यांची घरांचा वापर करतात. अशावेळी लोकांच्या घराला नुकसान पोहचते. 

जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर आहे, हो...केंद्रीय गृह मंत्रालयाने एक विशेष योजना आणली आहे. Central Scheme For Assistance Towords Damanged Immovable/Movable Property During Action by CPMF Army in Jammu and Kashmir या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचे घर आणि त्यांच्या साहित्याच्या नुकसानीसाठी १० लाख रूपये देते. ही योजना २०१० पासून सुरू आहे.

दहशतवादी तळांना भारताने टार्गेट केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे थेट हल्ल्यासोबतच तो दहशतवादी हल्ल्याचा कट रचू शकतो. जर एखादा दहशतवादी घरात लपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला साथ न देता सैन्याला साथ देण्याचं आवाहन करण्यात येते. ऑपरेशन करताना तुमचे जे काही नुकसान होईल त्याची भरपाई सरकारकडून केली जाते. त्यामुळे नुकसानीची चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या या योजनेतून केवळ घराचे नुकसान दिले जात नाही तर घरातील साहित्य, आवश्यक वस्तू यासाठीही पैसे दिले जातात. 

किती पैसे मिळतात?

सैन्याच्या ऑपरेशनवेळी नुकसान झाले असेल तर त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हापातळीवर समिती काम करते. त्यात नुकसान भरपाई म्हणून १० लाखांपर्यंत मदत मिळू शकते. घराच्या नुकसानीसाठी ७ लाख आणि साहित्याच्या नुकसानीसाठी ३ लाखापर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. या साहित्यात घरातील फ्रिज, टीव्ही, संगणक, वॉशिंग मशिन, फर्निचर यांचा समावेश असतो. ही मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. ही मदत मिळवण्यासाठी ऑपरेशन सुरू झाल्यापासून ३० दिवसात अर्ज करावा लागतो.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर