शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:19 IST

जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जम्मू - पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून १०० दहशतवाद्यांना ठार केले. भारताच्या या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी मिसाईल, ड्रोन हल्ले भारताने उधळले. परंतु काही ठिकाणी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घरे, दुकाने पडली आहेत. खासकरून जम्मू काश्मीरात नागरी वस्तीत हल्ले केले गेलेत. सैन्य कारवाईत बऱ्याचदा दहशतवादी लपण्यासाठी सर्वसामान्यांची घरांचा वापर करतात. अशावेळी लोकांच्या घराला नुकसान पोहचते. 

जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर आहे, हो...केंद्रीय गृह मंत्रालयाने एक विशेष योजना आणली आहे. Central Scheme For Assistance Towords Damanged Immovable/Movable Property During Action by CPMF Army in Jammu and Kashmir या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचे घर आणि त्यांच्या साहित्याच्या नुकसानीसाठी १० लाख रूपये देते. ही योजना २०१० पासून सुरू आहे.

दहशतवादी तळांना भारताने टार्गेट केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे थेट हल्ल्यासोबतच तो दहशतवादी हल्ल्याचा कट रचू शकतो. जर एखादा दहशतवादी घरात लपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला साथ न देता सैन्याला साथ देण्याचं आवाहन करण्यात येते. ऑपरेशन करताना तुमचे जे काही नुकसान होईल त्याची भरपाई सरकारकडून केली जाते. त्यामुळे नुकसानीची चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या या योजनेतून केवळ घराचे नुकसान दिले जात नाही तर घरातील साहित्य, आवश्यक वस्तू यासाठीही पैसे दिले जातात. 

किती पैसे मिळतात?

सैन्याच्या ऑपरेशनवेळी नुकसान झाले असेल तर त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हापातळीवर समिती काम करते. त्यात नुकसान भरपाई म्हणून १० लाखांपर्यंत मदत मिळू शकते. घराच्या नुकसानीसाठी ७ लाख आणि साहित्याच्या नुकसानीसाठी ३ लाखापर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. या साहित्यात घरातील फ्रिज, टीव्ही, संगणक, वॉशिंग मशिन, फर्निचर यांचा समावेश असतो. ही मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. ही मदत मिळवण्यासाठी ऑपरेशन सुरू झाल्यापासून ३० दिवसात अर्ज करावा लागतो.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर