शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
3
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
4
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
5
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
6
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
7
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
8
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
9
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
10
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
11
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
12
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
13
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
14
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
15
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
16
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
17
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
18
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
19
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
20
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:34 IST

India Vs Pakistan War Update: सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते.

ऑपरेशन सिंदूरवेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. राफेल पाडल्याची अफवेमागे चीन असल्याचा दावा नुकताच फ्रान्सने केला होता. आता फ्रान्सच्याच हवाई दल प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय हवाई दलाने एक राफेल विमान गमावल्याचा दावा केला आहे. 

सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते. भारताने यावर जास्त माहिती न देता लढाईमध्ये असे नुकसान होत असते, आपले सर्व पायलट सुखरूप माघारी आले असल्याचे म्हटले होते. यामुळे या दाव्याबाबत संदिग्धता होती. त्यावरून आता पडदा हटू लागला आहे. 

फ्रान्स हवाई दलाच्या प्रमुखांनी आता भारताला एका राफेल लढाऊ विमानाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आम्ही ८ देशांना राफेल लढाऊ विमाने विकली आहेत. परंतू, युद्धावेळी गमावलेले हे पहिले विमान असल्याचे ते म्हणाले. जेरोम बेलंगर यांनी हा दावा केला आहे. फ्रान्सच्या टॉपच्या अधिकाऱ्याने हा दावा केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानने राफेल पाडले की पडले याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, राफेल विमाने बनविणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने देखील भारताचे राफेल पडल्याचे म्हटले आहे. डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांच्या हवाल्याने एका फ्रेंच वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. भारताने त्यांचे एक राफेल लढाऊ विमान गमावले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. परंतू हे विमान शत्रूच्या माऱ्यामुळे नाही तर उंचावर तांत्रिक बिघाडामुळे पडल्याचे ट्रॅपियर यांनी म्हटले आहे. एव्हियन डी चासे या फ्रेंच वेबसाइटवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ही घटना विस्तारित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान १२,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर घडली, या घटनेमध्ये शत्रूचा सहभाग नव्हता किंवा शत्रूचा रडार संपर्क झाला नव्हता, असे यात म्हटले आहे. 

भारताने पाकिस्तानचा दावा नाकारलाही नव्हता, अन्...संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी काही दिवसांपूर्वीच लढाऊ कारवायांमध्ये अपरिहार्य नुकसान होते, असे म्हटले होते. तेव्हा त्यांनी राफेल किंवा इतर विमानांचा समावेश आहे की नाही याची पुष्टी केली नाही. परंतू, जेव्हा पाकिस्तान दावा करू लागला होता तेव्हा भारतीय सैन्य दलांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी आपले सर्व पायलट सुखरूप परत आल्याचे म्हटले होते. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धindian air forceभारतीय हवाई दलRafale Dealराफेल डीलFranceफ्रान्स