शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

भारत आता तो भारत राहिलेला नाही, दहशतवाद नष्ट करणारच!, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कराकट येथे झालेल्या भव्य सभेत ४८,५२० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कराकट येथे झालेल्या भव्य सभेत ४८,५२० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दहशतवादाविरोधातील देशाच्या लढ्याचा पुनरुच्चार केला.  तसेच, नक्षलवादाच्या विरोधातील यशस्वी मोहिमेवर प्रकाश टाकला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज बिहारच्या पवित्र भूमीवरून विकासाला नवी चालना देण्याचा संकल्प पूर्ण करत आहे. ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाल्याचा मला अभिमान आहे.” यावेळी त्यांनी उपस्थित मातांसह भगिनींच्या मोठ्या संख्येतील सहभागाबद्दल विशेष उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली.

दहशतवादाविरोधातील कारवाईचे वर्णन

पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, "ज्यांनी पाकिस्तानातून आमच्या देशावर हल्ले घडवले, त्यांच्या लपण्याच्या जागा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. भारत आता जुना राहिलेला नाही; नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली आहे."

त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत म्हटले की, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर कठोर प्रहार केला. “भारतीय सैन्याच्या साहसामुळे जगाने आमच्या सिंदूरची ताकद पाहिली आहे,” असे ते म्हणाले.

बीएसएफ जवानांचे शौर्य आणि बलिदान

मोदींनी बीएसएफच्या उपनिरीक्षक इम्तियाज यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अभेद्य ढाल बनून उभे राहिले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांच्या शौर्याला संपूर्ण जगाने सलाम केला आहे," असे ते म्हणाले.

नक्षलवादाविरोधातील लढ्यात मोठे यश

नक्षलप्रभावित भागांबाबत बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, "२०१४ पूर्वी १२५ जिल्हे नक्षलग्रस्त होते, तर आता ही संख्या केवळ १८ वर आली आहे. रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, रस्ते आणि रोजगाराच्या संधी आता नक्षलग्रस्त भागांमध्ये पोहोचत आहेत. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा माओवादी हिंसाचार पूर्णतः नष्ट होईल.”

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBiharबिहारIndiaभारत