शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:13 IST

Indus Water Treaty: पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता अशातच, भारताने पाकिस्तानला आणखी एक जोरदार झटका देण्याची तयारी केली आहे. 

भारताच्या प्रकल्पाने पाकिस्तानला धक्का रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या प्रदेशातील मुख्य प्रकल्पांपैकी एक म्हणजे चिनाब नदीवरील रणबीर धरणाची लांबी दुप्पट करणे. या नदीचे पाणी भारतातून पाकिस्तानातील पंजाबमधील शेती क्षेत्रात जाते.

रिपोर्टनुसार, जेव्हा भारत आपला प्रकल्प पूर्ण करेल, तेव्हा ते प्रति सेकंद 150 घनमीटर पाणी वळवू शकेल, सध्या फक्त 40 घनमीटर पाणी वळवण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी त्यांच्या संसदेत सांगितले की, त्यांच्या सरकारने भारताला पत्र लिहून सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. 

भारताच्या कृतीमुळे पाकला झटका बसणार

वॉशिंग्टनस्थित सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील जल सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड मिशेल म्हणाले की, भारताला धरणे, कालवे किंवा इतर पायाभूत सुविधा बांधण्यासाठी वेळ लागेल. पण, त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला की, त्यांना भारताकडून कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागू शकते, हे आता कळले असेल. 

दरम्यान, रणबीर कालव्याच्या विस्ताराच्या योजनेसोबतच, भारत अशा प्रकल्पांवरही विचार करत आहे, ज्यामुळे पाकिस्तानला वाटप केलेल्या नद्यांमधून पाण्याचा प्रवाह कमी होईल. यामुळे पाकिस्तानला स्वतःसाठी वीज निर्मिती करण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

भारताने जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केलीअहवालानुसार, भारताने जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केली आहे, ज्यामुळे वीज निर्मिती 3,360 मेगावॅटवरून 12,000 मेगावॅटपर्यंत वाढेल. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकणारे धरणे देखील समाविष्ट आहेत. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी (13 मे) सांगितले की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत भारत सिंधू पाणी करार स्थगित ठेवला जाईल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान