शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:13 IST

Indus Water Treaty: पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता अशातच, भारताने पाकिस्तानला आणखी एक जोरदार झटका देण्याची तयारी केली आहे. 

भारताच्या प्रकल्पाने पाकिस्तानला धक्का रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या प्रदेशातील मुख्य प्रकल्पांपैकी एक म्हणजे चिनाब नदीवरील रणबीर धरणाची लांबी दुप्पट करणे. या नदीचे पाणी भारतातून पाकिस्तानातील पंजाबमधील शेती क्षेत्रात जाते.

रिपोर्टनुसार, जेव्हा भारत आपला प्रकल्प पूर्ण करेल, तेव्हा ते प्रति सेकंद 150 घनमीटर पाणी वळवू शकेल, सध्या फक्त 40 घनमीटर पाणी वळवण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी त्यांच्या संसदेत सांगितले की, त्यांच्या सरकारने भारताला पत्र लिहून सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. 

भारताच्या कृतीमुळे पाकला झटका बसणार

वॉशिंग्टनस्थित सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील जल सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड मिशेल म्हणाले की, भारताला धरणे, कालवे किंवा इतर पायाभूत सुविधा बांधण्यासाठी वेळ लागेल. पण, त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला की, त्यांना भारताकडून कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागू शकते, हे आता कळले असेल. 

दरम्यान, रणबीर कालव्याच्या विस्ताराच्या योजनेसोबतच, भारत अशा प्रकल्पांवरही विचार करत आहे, ज्यामुळे पाकिस्तानला वाटप केलेल्या नद्यांमधून पाण्याचा प्रवाह कमी होईल. यामुळे पाकिस्तानला स्वतःसाठी वीज निर्मिती करण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

भारताने जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केलीअहवालानुसार, भारताने जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केली आहे, ज्यामुळे वीज निर्मिती 3,360 मेगावॅटवरून 12,000 मेगावॅटपर्यंत वाढेल. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकणारे धरणे देखील समाविष्ट आहेत. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी (13 मे) सांगितले की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत भारत सिंधू पाणी करार स्थगित ठेवला जाईल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान