शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतानेच ५७ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकचा कांगावा

By admin | Updated: August 20, 2014 13:03 IST

भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे असा कांगावा पाकिस्तानने बुधवारी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० -  दररोज भारतीय चौक्यांनर गोळीबार करुन शस्त्रसंधींचे उल्लंघन मारणा-या पाकिस्तानने 'भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे' असा कांगावा बुधवारी केला आहे. फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करण्याची जूनी पद्धत असून यात गैर काहीच नाही असे सांगत पाकने जम्मूतील फुटीरवादी नेत्यांसोबतच्या चर्चेची पाठराखण केली आहे. 
जम्मू काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांसोबत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दूल बसित यांनी मंगळवारी चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पाकची भूमिका मांडली.  ' दक्षिण आशियात शांतता निर्माण करण्यास पाकिस्तान सरकार कटीबद्ध असून स्वातंत्र्यदिनी मोदींनी सार्क देशांनी सहकार्य करण्याची भूमिका मांडली त्याचे आम्ही स्वागत करतो' असे बसित यांनी सांगितले. भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी पाक नेहमीच प्रयत्नशील असतो. जम्मूतील फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करण्याची जूनी परंपरा आहे. काश्मिरी जनताच शांतता प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे असे बसित यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधींच्या उल्लंघनाविषयी विचारले असता बसित यांनी भारतावरच शस्त्रसंधींचे खापर फोडले. भारतानेच तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन केले असा कांगावाही त्यांनी केला.