शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

India China Tension : LACवर 25 दिवसांनंतर पूर्व स्थिती, मागे हटले चिनी सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 18:42 IST

एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत.

ठळक मुद्देभारत-चीन यांच्यातील, पेट्रोलिंग पॉइंट -14, पेट्रोलिंग पॉइंट -15 आणि पेट्रोलिंग पॉइंट -17 वरून मागे हटण्याची प्रक्रिया संपली आहेपूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैनिकांनी एलएसीवर अतिक्रमण केल्यामुळे हा वाद वाढला होता. लडाखच्या फिंगर्स भागातून चिनी सैन्य मागे सरकत आहे. 

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्यांत झालेल्या हिंसक झटापटीनंतर बरोबर 25 दिवसांनी, म्हणजे आज, पेट्रोलिंग पॉइंट 17 (हॉट स्प्रिंगचा भाग) वरील चिनी सैनिक मागे हटण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच बरोबर आता भारत-चीन यांच्यातील, पेट्रोलिंग पॉइंट -14, पेट्रोलिंग पॉइंट -15 आणि पेट्रोलिंग पॉइंट -17 वरून मागे हटण्याची प्रक्रिया संपली आहे. तसेच लडाखच्या फिंगर्स भागातून चिनी सैन्य मागे सरकत आहे. 

चिनी सैनिक गुरुवारी हॉट स्प्रिंग भागातून दोन किलोमीटरपर्यंत मागे सरकले. दोन्ही देशांतील करारानुसार, चिनी सैनिक पेट्रोलिंग पॉइंट14, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेट्रोलिंग पॉइंट 17 आणि पेट्रोलिंग पॉइंट 17A भागापासून दोन किलोमीटर मागे सरकले आहे. यानंतर भारतीय सैन्यदेखील या जागांवरून दोन किलोमिटरपर्यंत मागे आले आहे. 

कमांडर स्तरावरील बैठक -पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैनिकांनी एलएसीवर अतिक्रमण केल्यामुळे सुरू झालेला भारत-चीन वाद दोन महिन्यांनंतर संपताना दिसत आहे. यापूर्वी  वाद सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांत सैन्य आणि राजकीय स्तरावर चर्चा झाल्या. 6 जूनच्या कोर कमांडर्सच्या बैठकीत एलएसीवरील अतिक्रमणाच्या वादावर तोडगा काढण्यावर सहमती झाली होती. मात्र, गलवानमध्ये झालेल्या हिंसक झटापटीने सीमेवरील तणाव अधिक वाढला होता.

सीमेवर 40 हजार सैनिक!एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत. परंतु अशी आशा आहे की, संवादाच्या आणखी काही फेऱ्यानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. 6 जून रोजी कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर 30 जून रोजी कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.

तत्पूर्वी, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात टेलिफोनवरून झालेल्या दोन तासांच्या चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवरून असलेले मतभेद वादामध्ये रूपांतरित होऊ न देण्यावर सहमती झाली होती. तसेच सीमेवर शांतता व सलोखा नांदावा यासाठी दोन्ही देशांनी ठरल्याप्रमाणे सैन्यमाघार लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही ठरले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनborder disputeसीमा वादBorderसीमारेषाSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान