शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:57 IST

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याच डावपेचांपुढे चीनला झुकावे लागले.

ठळक मुद्देभारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले.चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली.स्वतः पंतप्रधान मोदींनी लडाख दौरा करत चीनला इशारा दिला.

नवी दिल्ली -भारत-चीनदरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. मात्र, आता हा तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. चिनी सेन्य गलवान खोऱ्यातून आता जवळापस एक ते दोन किलो मीटर मागे हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याचा क्रमशः विचार केला, तर भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले, चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली, अमेरिकेसह अनेक देशांची चीनविरोधात वक्तव्ये आली, स्वतः पंतप्रधान लडाखमध्ये गेले, यापूर्वी लष्कर प्रमुखांनी लडाखचा दोरा केला, दुसरीकडे चर्चा सुरूच होती, अनेकदा उचकवण्याचा प्रयत्न होऊनही पंतप्रधानांनी चीनचे नावही घेतले नाही, यामुळे चर्चेचा दरवाजा खुला राहिला, अनेक अॅपवर बंदी घातली आणि अनेक चिनी कंपन्यांचे टेंडर रद्द करून दाखवून दिले, की भारत या मुद्द्यावर मागे हटणार नाही. परिणामी, प्रकरण वाढवले, तरी फायदा होणार नाही, हे चीनच्या लक्षात आले.

पंतप्रधानांचा लडाख दौरा -पंतप्रधानांनी नुकताच लडाख दौरा करत सैनिकांचे मनोबल वाढवले. यावेळी चीनचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी, हे यूग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, असे म्हणत चीनवर जबरदस्त घणाघात करत थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले होते, आम्ही श्रीकृष्णाच्या बासरीला आणि त्यांच्या सुदर्शन चक्रालाही आदर्श मानतो. यावेळी त्यांनी लडाखमधील जखमी जवानांचीही भेट घेतली होती. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 11 हजार फूट उंचावरील निमूलाही भेट दिली. जेथून पाकिसतान आणि चीन दोघांचाही एकाच वेळी सामना केला जाऊ शकतो. 

चिनवर अॅप्सबंदी करून मोठा वार -चीन सोबतच्या तणावातच मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्या आणि चीनला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसेल, असे जाणकारांचे मत आहे. 

आर्थिक पातळीवर फटका - भारत चीनला आर्थिक स्तरावर सातत्याने फटके देत आहे. आता, भारत सर्व चीनी कंपन्यांना हायवे प्रोजेक्ट्ससाठी बॅन करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी चिनी कंपन्यांना दिलेले रेल्वेचे अनेक ठोकेही रद्द करण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भातील नवा निर्णय सद्य स्थितीतील आणि भविष्यातीलही सर्व प्रोजेक्ट्ससाठी लागू असेल. 

प्रचंड मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले -याशिवाय भारताने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. एवढेच नाही, तर भारताची लढाऊ विमानंही चीनवर नजर ठेऊन आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाखIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल