शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:57 IST

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याच डावपेचांपुढे चीनला झुकावे लागले.

ठळक मुद्देभारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले.चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली.स्वतः पंतप्रधान मोदींनी लडाख दौरा करत चीनला इशारा दिला.

नवी दिल्ली -भारत-चीनदरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. मात्र, आता हा तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. चिनी सेन्य गलवान खोऱ्यातून आता जवळापस एक ते दोन किलो मीटर मागे हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याचा क्रमशः विचार केला, तर भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले, चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली, अमेरिकेसह अनेक देशांची चीनविरोधात वक्तव्ये आली, स्वतः पंतप्रधान लडाखमध्ये गेले, यापूर्वी लष्कर प्रमुखांनी लडाखचा दोरा केला, दुसरीकडे चर्चा सुरूच होती, अनेकदा उचकवण्याचा प्रयत्न होऊनही पंतप्रधानांनी चीनचे नावही घेतले नाही, यामुळे चर्चेचा दरवाजा खुला राहिला, अनेक अॅपवर बंदी घातली आणि अनेक चिनी कंपन्यांचे टेंडर रद्द करून दाखवून दिले, की भारत या मुद्द्यावर मागे हटणार नाही. परिणामी, प्रकरण वाढवले, तरी फायदा होणार नाही, हे चीनच्या लक्षात आले.

पंतप्रधानांचा लडाख दौरा -पंतप्रधानांनी नुकताच लडाख दौरा करत सैनिकांचे मनोबल वाढवले. यावेळी चीनचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी, हे यूग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, असे म्हणत चीनवर जबरदस्त घणाघात करत थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले होते, आम्ही श्रीकृष्णाच्या बासरीला आणि त्यांच्या सुदर्शन चक्रालाही आदर्श मानतो. यावेळी त्यांनी लडाखमधील जखमी जवानांचीही भेट घेतली होती. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 11 हजार फूट उंचावरील निमूलाही भेट दिली. जेथून पाकिसतान आणि चीन दोघांचाही एकाच वेळी सामना केला जाऊ शकतो. 

चिनवर अॅप्सबंदी करून मोठा वार -चीन सोबतच्या तणावातच मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्या आणि चीनला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसेल, असे जाणकारांचे मत आहे. 

आर्थिक पातळीवर फटका - भारत चीनला आर्थिक स्तरावर सातत्याने फटके देत आहे. आता, भारत सर्व चीनी कंपन्यांना हायवे प्रोजेक्ट्ससाठी बॅन करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी चिनी कंपन्यांना दिलेले रेल्वेचे अनेक ठोकेही रद्द करण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भातील नवा निर्णय सद्य स्थितीतील आणि भविष्यातीलही सर्व प्रोजेक्ट्ससाठी लागू असेल. 

प्रचंड मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले -याशिवाय भारताने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. एवढेच नाही, तर भारताची लढाऊ विमानंही चीनवर नजर ठेऊन आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाखIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल