शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:57 IST

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याच डावपेचांपुढे चीनला झुकावे लागले.

ठळक मुद्देभारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले.चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली.स्वतः पंतप्रधान मोदींनी लडाख दौरा करत चीनला इशारा दिला.

नवी दिल्ली -भारत-चीनदरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. मात्र, आता हा तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. चिनी सेन्य गलवान खोऱ्यातून आता जवळापस एक ते दोन किलो मीटर मागे हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याचा क्रमशः विचार केला, तर भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले, चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली, अमेरिकेसह अनेक देशांची चीनविरोधात वक्तव्ये आली, स्वतः पंतप्रधान लडाखमध्ये गेले, यापूर्वी लष्कर प्रमुखांनी लडाखचा दोरा केला, दुसरीकडे चर्चा सुरूच होती, अनेकदा उचकवण्याचा प्रयत्न होऊनही पंतप्रधानांनी चीनचे नावही घेतले नाही, यामुळे चर्चेचा दरवाजा खुला राहिला, अनेक अॅपवर बंदी घातली आणि अनेक चिनी कंपन्यांचे टेंडर रद्द करून दाखवून दिले, की भारत या मुद्द्यावर मागे हटणार नाही. परिणामी, प्रकरण वाढवले, तरी फायदा होणार नाही, हे चीनच्या लक्षात आले.

पंतप्रधानांचा लडाख दौरा -पंतप्रधानांनी नुकताच लडाख दौरा करत सैनिकांचे मनोबल वाढवले. यावेळी चीनचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी, हे यूग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, असे म्हणत चीनवर जबरदस्त घणाघात करत थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले होते, आम्ही श्रीकृष्णाच्या बासरीला आणि त्यांच्या सुदर्शन चक्रालाही आदर्श मानतो. यावेळी त्यांनी लडाखमधील जखमी जवानांचीही भेट घेतली होती. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 11 हजार फूट उंचावरील निमूलाही भेट दिली. जेथून पाकिसतान आणि चीन दोघांचाही एकाच वेळी सामना केला जाऊ शकतो. 

चिनवर अॅप्सबंदी करून मोठा वार -चीन सोबतच्या तणावातच मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्या आणि चीनला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसेल, असे जाणकारांचे मत आहे. 

आर्थिक पातळीवर फटका - भारत चीनला आर्थिक स्तरावर सातत्याने फटके देत आहे. आता, भारत सर्व चीनी कंपन्यांना हायवे प्रोजेक्ट्ससाठी बॅन करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी चिनी कंपन्यांना दिलेले रेल्वेचे अनेक ठोकेही रद्द करण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भातील नवा निर्णय सद्य स्थितीतील आणि भविष्यातीलही सर्व प्रोजेक्ट्ससाठी लागू असेल. 

प्रचंड मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले -याशिवाय भारताने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. एवढेच नाही, तर भारताची लढाऊ विमानंही चीनवर नजर ठेऊन आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाखIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल