शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:24 IST

सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण संस्थांची नजर आहे.गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे.

लेह - लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) सातत्याने तणाव वाढत आहे. यातच चीनने अपली तैनाती अणखी वाढवली आहे. आता चीनने सैन्याच्या दोन डिव्हिजन सीमेवर तैनात केल्या आहेत. याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानेही एलएसीवर आपली तैनाती वाढवली आहे. हा तणाव ऑक्टोबरपर्यंत असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट आणि शिनजियांग प्रांतात असलेले चीनचे 10 हजार अतिरिक्त सैनिक गेल्या काही दिवसांपासून युद्धाभ्यास करत आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण संस्थांची नजर आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी सूत्रांनीही एलएसीवर चीनने अतिरिक्त सैनिक तैनात केल्याची पुष्टी केली आहे.

भारताने ब्रिगेड एवढ्या जवानांना केले तैनात -गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारताने एक ब्रिगेड एवढे सैन्य तैनात केले आहे. याशिवाय भारताने रणनीतीक पॉइंट्सवरही आपली तैनाती अधिक वाढवली आहे. तसेच टँक आणि शस्त्रास्त्रे सीमेवर पोहोचविली जात आहेत.

चीनने 20 हजार जवान केले तैनात -सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी सैन्याचे अतिरिक्त डिव्हिजन 48 तासांत भारतीय पोझिशनवर पोहोचू शकते. 

पाकिस्तानने LOCवर आणले 20 हजार सैनिक -लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरू असतानाच पाकिस्ताननेही गिलगित-बाल्टिस्तानमध्ये एलओसीजवळ सैन्याच्या दोन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. म्हणजेच एलओसीजवळ जवळपास 20 हजार सैनिक तैनात करून पाकिस्तान भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पाकिस्तान, असे कृत्य चीनच्या इशाऱ्यावर करत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर -सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. चीन सीमेवर सातत्याने सैनिक वाढवत आहे. यामुळी चीनची काही चाल तर नाही ना? अशी शंका उत्पन्न होत आहे. कारण, चर्चेदरम्यान चीनने मागे हटन्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो सीमेवर सातत्याने तैनाती वाढवतच चालला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान