शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रला 'कलमेश्वर' पावणार; पाण्याची चिंता मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 6:51 PM

तेलंगाना सरकारने गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे निर्माण केले आहे.

हैदराबाद : गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प सर्वात कमी वेळात पूर्ण करण्यात आला. यामुळे तेलंगाना, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कलेश्वरम प्रकल्पाचे आज तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

तेलंगाना सरकारने गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे निर्माण केले आहे. या प्रकल्पात  22 पंप हाऊस वापरण्यात आले आहेत. या द्वारे दिवसाला तीन टीएमसी पाणी खेचण्याची ताकद निर्माण होणार आहे. 

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मेदिगड्डा, अन्नाराम, सुंडिला पंप हाऊस पाणी उचलण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जगातील सर्वात मोठे भूमिगत पंपहाऊस आहे. जे दिवसाला दोन टीएमसी पाणी खेचण्याची क्षमता ठेवते. आज आंध्र प्रदेशचे राज्यपाल नरसिंहम गुरु, तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगनमोहन रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

फडणवीस यांनी सांगितले की, कलेश्वरम प्रकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेने तेलंगानाला दिलेली भेट आहे. तेलंगाना सरकारने कमी वेळात हा प्रकल्प पूर्ण केला. ही योजना त्यांच्यासाठी एक यश आहे. 

 

केवळ 24 महिन्यांत प्रकल्प पूर्णजगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचा मान मिळालेल्या कलेश्वरम प्रकल्पाला केवळ 24 महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेतून गोदावरी नदीचे पाणी आधीच मेदिगड्डा पंप हाऊसपर्यंत पोहोचविण्यात आले होते. पंपांचा स्वीच ऑन केल्यास हे पाणी पुन्हा गोदावरी नदीमध्ये पोहचते. जे भूमिगत पाईपमधून वरच्या भागात असलेल्या अन्नाराम बराजपर्यंत पोहोचते. तीन टीएमसी पाण्यासाठी 7152 मेगावॅट वीजेची गरज लागणार आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस