शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:28 IST

Mohan Bhagwat News: सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलं आहे. आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं, असे  मोहन भागवत म्हणाले. 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले करत भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही भारतीय सैन्यदलाने अद्दल घडवली होती. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलं आहे. आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं, असे  मोहन भागवत म्हणाले.

यावेळी मोहन भागवत यांनी सांगितले की, जगाला धर्म शिकवणं हे भारताचं कर्तव्य आहे. धर्माच्या माध्यमातूनच मानवतेची उन्नती होणं शक्य आहे. विश्वकल्याण हा आमचा प्रमुख धर्म आहे. भारताची भूमिका ही जगात मोठ्या भावासारखी आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, भारत विश्वशांती आणि सौहार्द कायम करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. भारत कुणाचाही द्वेष करत नाही मात्र जोपर्यंत तुमच्याजवळ शक्ती नसेल, तोपर्यंत जग प्रेमाची भाषा समजून घेणार नाही. जामुळे जगाच्या कल्याणासाठी शक्ती असणं आवश्यक आहे, तसेच आमची ताकद जगाने पाहिली आहे.  शक्ती हे असे माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून भारत जगात आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडू शकतो, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत