शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

"अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 10:51 IST

"काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल."

इडुक्की : काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, ते तयार नसतील तर पर्याय शाेधावा लागेल, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. (If Rahul Gandhi is not ready for the presidency, then we have to find an alternative says Shashi Tharoor)

इडुक्की जिल्ह्यातील थाेडुपुआ येथे आयाेजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, साेनिया गांधी यांनी अनेक वर्षे पक्षाचे यशस्वीरीत्या नेतृत्व केले. त्यांनी पक्षाला बळकटी दिली. मात्र, त्यांनी स्वत: अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षाची नेमणूक करणे आवश्यक आहे. माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण हाेईल, असा विश्वासही थरुर यांनी व्यक्त केला. 

शशी थरूर यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र, ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला पर्याय शाेधावा लागेल. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असून, या प्रक्रियेला आता गती मिळायला हवी, असे थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले.

नेतृत्वाची गरज- काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल, असे शशी थरूर म्हणाले. - काँग्रेसमध्ये पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असून, वरपासून खालपर्यंत माेठे बदल करायला हवे, अशा मागणीचे पत्र गेल्या वर्षी साेनिया गांधी यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी लिहिले हाेते. त्यात शशी थरूर यांचाही समावेश हाेता. थरूर यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस