शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 13:44 IST

अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीला मदतच झाली आहे.

नवी दिल्ली- राज्यसभेत उपाध्यक्षांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकार एक परिक्षाच पास झाले आहे असे म्हणावे लागेल. या निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या एकजुटीमध्ये मात्र काही त्रूटी असल्याचे दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोन केला नाही म्हणून आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी अनुपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला ही निवडणूक आणखी सोपी गेली.  राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारु शकतात तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना (मतदान करण्याची विनंती करणारा) फोन का करु शकत नाहीत?असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंग यांनी विचारला आहे. आपला उमेदवार जिंकावा यासाठी नितिशकुमार प्रयत्न करतात तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी राहुल का प्रयत्न करत नाहीत? आम्ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसची मदत केली मात्र साधे आभारही मानले गेले नाहीत अशी खंत संजय सिंग यांनी व्यक्त केली आहे.

 2014 साली केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अनेकदा नामुष्कीजनक ठरावांना, दुरुस्त्यांना सामोरे जावे लागले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावातही विरोधकांनी मांडलेल्या दुरुस्त्यांना केवळ बहुमत नसल्यामुळे मान्य करावे लागले.  आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे असे दिसून येते. राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले असले तरी अनेक महत्त्वाच्या निर्णयांबाबतीत, ठरावांसाठी मित्रपक्षांना आणि कधीकधी विरोधकांनाही विनंती करावी लागते. उपाध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची चिन्हे मावळल्यावर भारतीय जनता पार्टीला मित्रपक्षांमधील उमेदवार शोधणे भाग पडले. बिजू जनता दलाला आपल्या गटात ओढण्यासाठी त्यांच्या सदस्यांपैकीही चाचपणी करुन झाली. तसेच अकाली दलाच्या गुजराल यांचे नाव पुढे करुनही त्यावर चर्चा करण्यात आली. शेवटी आता मित्रपक्षांमध्ये संबंध सर्वात जास्त ताणल्या गेलेल्या जनता दल युनायटेडच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.जदयु उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती करणारा फोन पंतप्रधान मोदी यांनी बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांना केला तर शेवटच्या दोन दिवसांमध्ये अकाली दल व शिवसेना यांचाही पाठिंबा त्यांनी मिळवला. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना या मतदानामध्ये भाग घेणार नाही अशीही चर्चा होती.244 खासदारांच्या राज्यसभेत बहुमताचा आकडा 123 होता. मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे तो 119 वरती आला. केजरीवालांच्या आपसब वायएसआर काँग्रेस, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्षाचे सदस्यही उपस्थित राहिले नाहीत.विरोधकांच्या गोटामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, सनाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देसम पक्ष यांचा समावेश होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस