शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:07 IST

विमानतळावर पाच दिवसांपासून फ्लाइट रद्द होण्याचं सत्र सुरू असतानाच, एका प्रवाशाला जीव गमवावा लागला आहे.

विमानतळावर पाच दिवसांपासून फ्लाइट रद्द होण्याचं सत्र सुरू असतानाच, एका प्रवाशाला जीव गमवावा लागला आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, एअरपोर्टवर तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थेवर आणि एअरलाईनच्या मनमानी कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

तणावात असलेल्या प्रवाशाचा 'वेटिंग'मध्येच मृत्यू

कानपूरच्या कल्याणपूर भागातील रहिवासी असलेले ४६ वर्षीय अनूप कुमार पांडेय हे कोका-कोला कंपनीत सेल्स झोनल हेड म्हणून कार्यरत होते आणि ते बंगळूरु येथे कुटुंबासोबत राहत होते. पाच दिवसांपूर्वी ते एका नातेवाइकाच्या तेराव्यासाठी कानपूरला आले होते. शुक्रवारी रात्री ते 'एअर इंडिया'च्या विमानाने दिल्लीमार्गे बंगळूरुला परतणार होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंडिगो कर्मचाऱ्यांचा संप आणि खराब हवामानामुळे लखनऊ विमानतळावरील विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. फ्लाईट रद्द होण्याच्या या अनिश्चिततेमुळे अनूप पांडेय प्रचंड तणावात होते. ते विमानतळावर फ्लाईटची वाट पाहत असतानाच, अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तीव्र हार्ट अटॅक आला.

"१० मिनिटांत उपचार मिळाले असते, तर भाऊ वाचला असता!"

अनूप पांडेय यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी विमानतळ प्राधिकरणावर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत. अनूप यांचे मोठे बंधू व वकील अनिल पांडेय यांनी सांगितले, "रात्री ९ वाजता अनूपचे वहिनीसोबत शेवटचे बोलणे झाले. त्यावेळी तो विमानाची वाट पाहत असल्याचे म्हणाला होता. रात्री ११ वाजता लोकबंधु रुग्णालयातून फोन आला की, अनूपला मृत घोषित करण्यात आले आहे."

अनिल पांडेय यांचा आरोप आहे की, विमानतळावर तातडीने उपचार देण्यासाठी कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता आणि त्वरित रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. "जर १० ते १५ मिनिटांत त्याला सीपीआर किंवा प्राथमिक उपचार मिळाला असता, तर माझा भाऊ वाचला असता," असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

अनूप यांच्या पश्चात पत्नी पूजा, ११वीत शिकणारी १७ वर्षांची मुलगी श्रेया आणि हायस्कूलमध्ये असलेला मुलगा पारस असा परिवार आहे. रविवारी पोस्टमॉर्टमनंतर अनूप यांचे पार्थिव कानपूरला आणले असता, संपूर्ण कुटुंबाने टाहो फोडला. प्री-बोर्ड परीक्षा सोडून आलेला मुलगा पारस आणि वडिलांच्या निष्प्राण देहाला मिठी मारून रडणारी मुलगी श्रेया यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

सलग पाचव्या दिवशी फ्लाईट रद्द; प्रवाशांची हेळसांड सुरूच!

अनूप पांडेय यांच्या मृत्यूने विमानतळावरील आरोग्य सुविधांची कमतरता समोर आणली आहे, पण यासोबतच एअरलाईन कंपन्यांच्या मनमानी कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इंडिगोचा संप आणि खराब हवामानामुळे लखनऊ विमानतळावर सलग पाचव्या दिवशी विमानांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तास-न्-तास विमानतळावर ताटकळत राहिलेल्या अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. कोणाचे विदेशात जाण्याचे नियोजन बिघडले, तर अनेकांना हॉटेल आणि टॅक्सीचा अतिरिक्त खर्च सोसावा लागला.

'डीजीसीए'ने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. पूर्वसूचना न देता फ्लाईट रद्द करणे हा प्रवाशांवर अन्याय आहे, तसेच एअरलाईन कंपन्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lucknow Airport: Man dies waiting; alleged lack of medical aid.

Web Summary : A man died at Lucknow airport due to a heart attack amidst flight cancellations. Family alleges delayed medical assistance contributed to his death. Flight disruptions caused passenger distress, highlighting airport facility concerns and airline accountability.
टॅग्स :AirportविमानतळUttar Pradeshउत्तर प्रदेश