शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

'मोदी सत्तेत न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला', भाजपा मंत्र्याने तोडले तारे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 11:29 AM

कामपूरच्या नायगाव येथील एका सभेला संबोधित करताना सर्मा यांनी भाजपाला निवडूण देण्याचं आवाहन केलंय.

गुवाहटी - भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्य किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करताना भीती दाखविण्याच काम सुरूच आहे. आसाममधील मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी पुन्हा एकदा भाजपाला निवडणूक देण्याचं आवाहन केलंय. जर पुन्हा एकदा भाजपा सत्तेत आल नाही, तर पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला करतील, असे हिमांता विश्वा यांनी म्हटलंय. 

कामपूरच्या नायगाव येथील एका सभेला संबोधित करताना सर्मा यांनी भाजपाला निवडूण देण्याचं आवाहन केलंय. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि आसाममध्ये भाजपा सरकार निवडूण न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला करण्यात येईल. तसेच पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवाद्यांकडून आसामच्या विधानसभा सभागृहावरही हल्ला होईल आणि त्यावेळी असलेले पंतप्रधान काहीही करू शकणार नाहीत. कारण, पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं धाडस त्या पंतप्रधानांकडे नसणार आहे, असे म्हणत आसामचे मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी भाजपाला मत देण्याच आवाहन केलं आहे. नवीन भारतच पाकिस्तानला समर्थपणे उत्तर देऊ शकतो, याच सरकारमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं धाडस आहे, असेही शर्मा यांनी म्हटले. 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्या 130 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या नेटीझन्सने सोशल मीडियावरुन पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा उदो उदो केला होता. विशेष म्हणजे काँग्रेस अशा लोकांना पाठिशी घालत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी निर्मला सितारमण यांनीही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. तसेच देशात पुन्हा एकदा मोदी सरकर न आल्यास भारत देश 50 वर्षे पाठीमागे जाईल, असे सितारमण यांनी बंगळुरू येथील थिंकर फोरमच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. त्यानंतर, सोशल मीडियावरुन त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. दरम्यान, शर्मा हे 2001 पासून 2015 पर्यंत भारतीय काँग्रेसचे सदस्य आणि आमदार होते. मात्र, मे 2016 मध्ये शर्मा यांनी भाजपाचे सदस्यत्व स्विकारले आहे. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBJPभाजपाAssamआसामIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानParliamentसंसद