जैसलमेरमध्ये भीषण अपघात! उंटांच्या कळपाला ट्रेनने दिली धडक, सहा उटांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:29 IST2026-03-16T12:14:59+5:302026-03-16T12:29:36+5:30

राजस्थानातील जैसलमेर येथील श्री भदरिया-लाठी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने धडक दिल्याने सहा उंटांचा मृत्यू झाला. हा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला.

Horrific accident in Jaisalmer! Train hits a herd of camels, six camels die on the spot | जैसलमेरमध्ये भीषण अपघात! उंटांच्या कळपाला ट्रेनने दिली धडक, सहा उटांचा जागीच मृत्यू

जैसलमेरमध्ये भीषण अपघात! उंटांच्या कळपाला ट्रेनने दिली धडक, सहा उटांचा जागीच मृत्यू

राजस्थानातील जैसलमेर येथे भीषण अपघात घडला. सोमवारी सकाळी श्री भदरिया-लाठी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने उंटाच्या कळपाला धडक दिली. यामध्ये सहा उंटांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. मृत उंटांचे शवविच्छेदन करण्याची आणि बाधित पशुधन मालकांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी पशुधन मालकांकडून केली जात आहे.

५०० रुपयांच्या लाचेचा खटला ३६ वर्षे चालला,आरोपी ७५ वर्षांचा झाला; सर्वोच्च न्यायालयाला आली दया, शिक्षेबाबत घेतला मोठा निर्णय

उंटांचा एक कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला. त्यांना अचानक एका जाणाऱ्या ट्रेनने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की उंट उडून दूरवर पडले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघाताचे दृश्य भयानक होते. उंटांचे मृतदेह रेल्वे रुळांवर विखुरलेले होते, या घटनेने परिसरातील लोकांना धक्का बसला.

माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मुकेश भिल यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पशुपालक घटनास्थळी पोहोचले. या अपघाताबद्दल लोकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या रेल्वे मार्गावर यापूर्वीही अनेकदा गाड्यांची धडक होऊन प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, परंतु असे असूनही, रेल्वे विभाग आणि प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.

रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारत असताना, वन्यजीवांना या विकासाची किंमत त्यांच्या जीवांनी चुकवावी लागत आहे. रेल्वे रुळांभोवती पुरेशी सुरक्षा आणि कुंपण नसल्याने, वन्यजीव दररोज अपघातांचे बळी ठरत आहेत.

उंटांचे शवविच्छेदन करण्याची मागणी

मृत उंटांचे योग्य शवविच्छेदन करावे आणि ज्यांचे उंट मृत्युमुखी पडले आहेत त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पशुधन मालकांनी केली आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि रेल्वे विभागाने अशा संवेदनशील भागात रेल्वे रुळांवर मजबूत कुंपण बसवावे किंवा गाड्यांचा वेग नियंत्रित करावा अशी मागणीही केली आहे. 

Web Title : जैसलमेर: ट्रेन की चपेट में आने से छह ऊंटों की मौत, ग्रामीणों ने की कार्रवाई की मांग।

Web Summary : जैसलमेर में एक ट्रेन ने ऊंटों के झुंड को टक्कर मार दी, जिससे छह की मौत हो गई। ग्रामीणों ने मालिकों के लिए मुआवजे और वन्यजीवों से जुड़ी भविष्य की घटनाओं को रोकने के लिए रेलवे ट्रैक पर बेहतर सुरक्षा उपायों की मांग की है।

Web Title : Jaisalmer: Train hits camels, six dead, villagers demand action.

Web Summary : In Jaisalmer, a train struck a camel herd, killing six. Villagers are demanding compensation for owners and better safety measures on the railway tracks to prevent future incidents involving wildlife.