शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah : संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 21:41 IST

गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे...

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जम्मू-काश्मीरसंदर्भात आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. भलेही तेथील नेते संपुष्टात आणलेले आर्टिकल 370 पुन्हा बहाल करण्याची मागणी करत असोत, पण सरकारने, ते राज्याच्या संपूर्ण विकासासाठी वचनबद्ध आहेत. तसेच, संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमन (सीमा ठरवणे अथवा सीमांकन) आणि निवडणुका आवश्यक आहेत, असे स्पष्ट केले आहे. (HM Amit Shah delimitation and elections of jammu and kashmir necessary for full statehood center is committed)

गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट -केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी बैठकीनंतर ट्विट करत म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आजची बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सर्वांनीच लोकशाही आणि संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवली. तसेच, राज्यात लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यावर भर दिला. 

मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही -गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे, केंद्र सरकार तेथे सर्वप्रथम परिसीमनाचे कार्य करेल. यामुळे राज्यातील निवडणूक मतदारसंघाची पनर्रचना होईल. यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बदल केले जाऊ शकतात. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नव्या विधानसभेची निर्मिती होईल. 

5 ऑगस्त 2019 रोजी कम्मू काश्मीरला लागू असलेल्या अनुच्छेद 370 मधील अनेक तरतुदी नष्ट केल्यानंतर जम्मू-काश्मीरला दिल्ली आणि पुदुचेरी प्रमाणे केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्यांच्या आपल्या विधानसभा आहेत. याच पद्धतीने तेथेही विधानसभेची स्थापना होईल. या सर्वपक्षीय बैठकीत आणि त्यानंतर मिडियासोबत बोलताना पीडीपी नेत्या महबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे अनुच्छेद 370 पुन्हा बहाल करण्याची मागणी केली आहे. 

उमर अब्दुल्लांचं वक्तव्य -बैठकीनंतर उमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही बैठकीत म्हणालो, की 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने अनुच्छेत 370 हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करणार नाही. आम्ही न्यायालयाच्या माध्यमाने 370 च्या मुद्द्यावर आमचा लढा लढू. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370