शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे पूल तुटला; पर्यटकांच्या गाडीवर कोसळले दगड, नऊ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 4:18 PM

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडांवरून सातत्याने दगड पडत आहेत. यामुळे रेस्क्यूत अडचण येत आहे.

किन्नौर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. यात गाडीवर मोठ-मोठे दगड पडून नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगण्यात येते, की हे पर्यटक दिल्ली आणि चंदिगडहून हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी आले होते. (Himachal pradesh Landslide in Kinnaur bridge collapsed; Rocks fall on tourist vehicle, nine people killed)

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडांवरून सातत्याने दगड पडत आहेत. यामुळे रेस्क्यूत अडचण येत आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. ते लवकरच पोहोचेल, असे आश्वासम मिळाले आहे. किन्नौरचे डीसी आबिद हुसैन सादिक, एसपी एसआर राणा हेही घटनास्थळी दाखल होते.

एक हजार वर्षांनंतर चीनमध्ये पुराचं भयंकर थैमान; लोक म्हणतायत- जगात कोरोना पसरवला, त्याचाच परिणाम...!

घटनास्थळी बटसेरीतील लोक पोलिसांना रेस्क्यूसाठी मदत करत आहेत. भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूलही तुटला आहे. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनासह पहाडावरून मोठ-मोठे दगड पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे

तथापि, पाऊस सुरूच असल्याने प्रशासनाने पर्यटक आणि स्थानिक लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, उपायुक्त नीरज कुमार म्हणाले, ढगफुटीमुळे खराब झालेला रस्ता पूर्ववत करण्यात येत आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनHimachal Pradeshहिमाचल प्रदेशDeathमृत्यूRainपाऊस