शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा, 35 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 10:27 AM

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

नवी दिल्ली - मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि  गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत.उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास 800 खांब आणि 70 ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच मदत जाहीर करण्यात आली आहे. 

पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कमलनाथ यांनी ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून तासाभरात उत्तर आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (17 एप्रिल) सकाळी नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं ट्वीट केलं होतं. यामध्ये गुजरातमधील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या या ट्वीटनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर नुकसान भरपाईवरून भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. तसेच नुकसान भरपाई ही केवळ गुजरातसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. 

'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तुमची भावनिकता ही केवळ गुजरातपुरतीच मर्यादीत आहे का? तुमच्या पक्षाचे सरकार असले तरी मध्य प्रदेशमध्येही लोक राहतात' असं ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे. कमलनाथ यांच्या ट्वीटनंतर तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि अन्य राज्यातील मुसळधार पावसात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरातRajasthanराजस्थानDeathमृत्यूRainपाऊस