शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:12 IST

Hathras Stampede Bhole Baba And Mayawati : बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच भोले बाबांना सरकारचं संरक्षण असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. २ जुलै रोजी हाथरस जिल्ह्यात नारायण साकार हरी म्हणजेच भोले बाबांच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अलीकडेच ३२०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. याप्रकरणी आता बसपा प्रमुख मायावती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच भोले बाबांना सरकारचं संरक्षण आहे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. "उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोकांच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सूरजपाल सिंह उर्फ ​​भोले बाबा यांचं नाव नसणं हे राजकारण आहे. यावरून असं सिद्ध होतं की, अशा लोकांना राज्य सरकारकडून संरक्षण मिळतं, जे अनुचित आहे."

"मीडियाच्या म्हणण्यानुसार, या दु:खद घटनेबाबत २३०० पानांच्या आरोपपत्रात ११ जणांना आरोपी करण्यात आलं आहे, परंतु भोले बाबा यांच्याबाबत सरकारचं आधीसारखंच असलेलं मौन योग्य आहे का? या सरकारी वृत्तीने अशा घटना यापुढे थांबवता येणं शक्य आहे का? सर्वसामान्य जनता चिंतेत आहे" असंही मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात ११ जणांचा उल्लेख करण्यात आला असून, ज्यांनी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती. बचाव पक्षाचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांनी ३२०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं. 

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक देव प्रकाश मधुकर यांच्यासह १० आरोपींना अलीगड जिल्हा कारागृहातून हाथरस जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. एक आरोपी मंजू यादव अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सध्या बाहेर आहे. या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशीही केली जात आहे. 

टॅग्स :mayawatiमायावतीPoliceपोलिस