शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

याकुब मेमनसाठी मध्यरात्रीही उघडतं सुप्रीम कोर्ट, पण राम मंदिरासाठी 'तारीख पे तारीख' - अनिल विज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 13:13 IST

Ram Mandir : निवडणुका जवळ आल्या सर्व राजकीय नेतेमंडळींसाठी राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी असतो.

नवी दिल्ली - निवडणुका जवळ आल्या सर्व राजकीय नेतेमंडळींसाठी राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी असतो. आगामी काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे तर काही महिन्यांवर लोकसभा निवडणूकदेखील येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर, राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. प्रत्येक राजकीय नेता राम मंदिराचा मुद्दा लावून धरताना दिसत आहे. भाजपाचे नेते आणि हरियाणातील मंत्री अनिल विज यांनीही अयोध्येतील राम मंदिर विवादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिर विवादासंदर्भात सुप्रीम कोर्ट घेत असलेल्या भूमिकेवर विज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अनिल विज म्हणाले की, सुप्रीम कोर्ट महान आहे, जे हवे ते करावे. सर्व सुप्रीम कोर्टाची इच्छा. हवे असल्यास याकुब मेमनसाठी मध्यरात्रीही सुप्रीम कोर्ट उघडावे. पण जेव्हा राम मंदिराचा विषय येतो, ज्याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. त्यावर 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. ही सर्व तर सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे. 

(राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव)

दरम्यान, राम मंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी तीन महिने म्हणजेच जानेवारी २0१९पर्यंत पुढे ढकलल्याने संघ परिवारातील सर्व संघटना संतापल्या असून, मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी मोदी सरकारने आता वटहुकूम आणावा, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाAnil Vijअनिल विज