शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

योगी सरकारमध्ये भाजपा आमदारच हतबल; मुलाच्या मृत्यूनंतर तक्रारीसाठी मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 20:11 IST

BJP MLA Rajkumar Agrawal : उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींवर पोहोचली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येभाजपाशासित सरकार असूनही भाजपाच्या आमदाराला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी महिन्याभरापासून चकरा माराव्या लागत असल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल (Rajkumar Agrawal) गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत.

राजकुमार अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडे याबाबत तक्रार केली. मात्र कोणीच त्यांचं ऐकून घेत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलला काकोरीच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 26 एप्रिलला त्यांच्या मुलाचे निधन झाले. मुलाचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. "26 एप्रिलला मुलांचं ऑक्सिजन लेव्हल 94 इतकी होती. तो नीट जेवतही होता. सर्वांशी संवाद देखील साधत होता."

"संध्याकाळी अचानक डॉक्टरांनी सांगितलं त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. त्याच्यासाठी आम्ही दोन ऑक्सिजन सिलिंडरचा बंदोबस्त केला. मात्र डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलिंडर त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला" असा आरोप भाजपा आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे झालं आहे. याबाबतची तक्रार मी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे केली. मात्र अद्याप माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. माझी मागणी आहे की, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावं आणि हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज"; मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांचं विधान 

मेघालयमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. या महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत जवळपास पाचपट वाढ झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीसमोर तिथलं सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी एक विधान केलं आहे." माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज त्याच्या आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपण कुणीच नाही" असं म्हटलं आहे. तसेच येत्या 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सर्वांना आपल्या घरी आपापल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं आहे. मेघालय सरकारनं त्यासंदर्भात परिपत्रकच काढलं आहे. मेघालयमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 731 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर