शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

योगी सरकारमध्ये भाजपा आमदारच हतबल; मुलाच्या मृत्यूनंतर तक्रारीसाठी मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 20:11 IST

BJP MLA Rajkumar Agrawal : उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींवर पोहोचली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येभाजपाशासित सरकार असूनही भाजपाच्या आमदाराला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी महिन्याभरापासून चकरा माराव्या लागत असल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल (Rajkumar Agrawal) गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत.

राजकुमार अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडे याबाबत तक्रार केली. मात्र कोणीच त्यांचं ऐकून घेत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलला काकोरीच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 26 एप्रिलला त्यांच्या मुलाचे निधन झाले. मुलाचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. "26 एप्रिलला मुलांचं ऑक्सिजन लेव्हल 94 इतकी होती. तो नीट जेवतही होता. सर्वांशी संवाद देखील साधत होता."

"संध्याकाळी अचानक डॉक्टरांनी सांगितलं त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. त्याच्यासाठी आम्ही दोन ऑक्सिजन सिलिंडरचा बंदोबस्त केला. मात्र डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलिंडर त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला" असा आरोप भाजपा आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे झालं आहे. याबाबतची तक्रार मी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे केली. मात्र अद्याप माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. माझी मागणी आहे की, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावं आणि हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज"; मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांचं विधान 

मेघालयमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. या महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत जवळपास पाचपट वाढ झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीसमोर तिथलं सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी एक विधान केलं आहे." माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज त्याच्या आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपण कुणीच नाही" असं म्हटलं आहे. तसेच येत्या 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सर्वांना आपल्या घरी आपापल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं आहे. मेघालय सरकारनं त्यासंदर्भात परिपत्रकच काढलं आहे. मेघालयमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 731 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर