शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

Bhima Koregaon Violence: ... तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील,  प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 12:29 IST

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

भोपाळ -  भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. भाजपाविरोधात विरोधकांकडून ‘लाठी रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं, या सभेला आंबेडकरांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याव्यतिरिक्त माजी खासदार शरद यादवही या सभेत सहभागी झाले होते.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या 52व्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपाविरोधात लाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना आंबेडकरांनी आरोप केला की, 'महाराष्ट्र सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी पीडित व्यक्तींनाच त्रास देत आहे. हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. जर सरकारने दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील, असं विधान त्यांनी या सभेत केलं. समाजवादी नेते शरद यादव यांनी  देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले.

जर सरकारनेच या प्रकरणातील दोषींना मदत करायला सुरुवात केली तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण ? देशातील अवस्था बिकट झाली असून ती दिवसेंदिवस आणखी बिकट होत जाईल, अशी भीतीही यादव यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonभीमा-कोरेगावBJPभाजपा