शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 11:47 IST

India And Pakistan : पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे.

नवी दिल्ली - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक मेंढपाळ 2008 मध्ये चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेला होता. गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली असून पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्छ जिल्ह्यातील नाना दिनारा गावातील 60 वर्षीय इस्माईल समा राहतात. आपल्या मेंढ्या चारत असताना चुकून त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. 

भारतीय उच्चायुक्तानी दाखल केलेल्या एका याचिकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दोन दिवस आधीच इस्माईल समा यांची मुक्तता करण्यात आली आहे. अटारीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन इस्माईल समा हे अमृतसरला पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे काही कुटुंबीयही त्यांना घेण्यासाठी वाघा-अटारी बॉर्डरवर दाखल झाले होते. अमृतसरमध्ये काही औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या जातील. ज्यामध्ये समा यांच्या आरोग्य तपासणीचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

"मी आपल्या मेंढ्यांना चारत असताना चुकून पाकिस्तानच्या दिशेनं गेलो होतो. त्यांनी मला एक गुप्तहेर आणि RAW एजंट म्हणून अटक केली. आयएसआयने मला 6 महिने कारागृहात ठेवलं. त्यानंतर मला पाकिस्तानच्या सैन्याकडे सोपवण्यात आलं. 5 वर्षे शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी मी 3 वर्षे त्यांच्या ताब्यात होतो. ऑक्टोबर 2016 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही माझी सुटका करण्यात आली नाही. मी 2018 पर्यंत हैदराबाद सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यानंतर मला दोन अन्य भारतीय कैद्यांसोबत कराचीच्या कारागृहात पाठवण्यात आलं" अशी माहिती इम्साईल समा यांनी दिली आहे.

पत्रकार जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, समा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर पीस अँड डेमोक्रसी आणि अन्य एका स्थानिक एनजीओने दोन्ही सरकारकडे संपर्क सुरू केला. त्याचबरोबर पाकिस्तान उच्चायुक्तांना एक पत्र लिहिलं आणि समा यांच्या सुटकेची मागणी केली. समा यांची सुटका ही भारतीय उच्चायुक्तांनी चार भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केल्यानंतर होऊ शकली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातIndiaभारतPakistanपाकिस्तान