शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पीक विमा योजनेतून खासगी कंपन्यांना घसघशीत नफा; पीएमएफबीवायमध्ये शेतकरी लुबाडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 8:16 AM

पीएमएफबीवायमध्ये शेतकरी लुबाडले गेले, महाराष्ट्र, गुजरातेत मोठे नुकसान

हरीश गुप्तानवी दिल्ली : खासगी विमा कंपन्यांनी २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून (पीएमएफबीवाय) जवळपास १० हजार कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमावला. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी आणि सरकारने या खासगी विमा कंपन्यांना वरील दोन वर्षांत विम्याचा हप्ता म्हणून ३१,९०५ कोटी रुपये दिले. त्या बदल्यात या कंपन्यांनी शेतकऱ्यांचे २१,९३७ कोटी रुपयांचे विम्याचे दावे अदा केले. या व्यवहारात कंपन्यांनी ९,९६८ कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमावला.

महाराष्ट्राने हप्त्याचे ४,७८७ कोटी रुपये या कंपन्यांना दिले. कंपन्यांनी दाव्यापोटी फक्त ३,०९४ कोटी रुपये परत दिले. गुजरातमध्ये विम्याचे हप्ते आणि दाव्यांची रक्कम यात १४५ टक्क्यांपेक्षा जास्त फरक आहे. पश्चिम बंगालमध्ये कंपन्यांना २८१ कोटी रुपयांचा हप्ता मिळाला व त्यांनी ५९ कोटी रुपयांचे दावे मान्य केले. याच कारणांमुळे पंजाब, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक राज्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून अंग काढून घेतले आणि आपल्या स्वत:च्या योजना राबविल्या. 

गुजरातसह काही राज्यांनी वर्ष २०२०-२१ मध्ये पीएमएफबीवाय राबविली नाही. या विमा कंपन्यांना हप्त्याची निम्मी रक्कम राज्य आणि केंद्र सरकारने दिली. दुसरे म्हणजे विमा कंपन्या एकूण पीक क्षेत्राच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त कव्हरेज एरिया विस्तारण्यात असमर्थ आहेत. शिवाय दावे निकाली काढण्यात फार मोठा विलंब लागतो.

राज्य    दिलेला हप्ता (कोटींत)    दिलेले दावे(२०१८-१९ आणि २०१९-२०)   (२०१८-१९,२०१९-२०)महाराष्ट्र    ४,७८७    ३,०९४गुजरात    ५,२४५     २,१५८हरयाणा`    १,२८०    १,०१५ओदिशा    २,०९०    १,०२६उत्तर प्रदेश    १,८९५    ५९५पश्चिम बंगाल    २८१    ५९एकूण (सर्व राज्ये)      ३१,९०५    २१,९३५

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र