शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

मोठमोठी आश्वासने; पण ती अमलात येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:49 AM

राजस्थानात प्रचाराची मुदत संपण्यास एकच दिवस शिल्लक उरला आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजपा आणि स्थानिक पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

- सुहास शेलारजयपूर : राजस्थानात प्रचाराची मुदत संपण्यास एकच दिवस शिल्लक उरला आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजपा आणि स्थानिक पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. जिथे अटीतटीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे, अशा मतदारसंघांत नेत्यांनी तळ ठोकला आहे. पंच, सरपंच व जातप्रमुखांना हाताशी धरून समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजस्थानातील पावणेपाच कोटी मतदारांपैकी ६७ टक्के मतदार शेतकरी आहेत आणि २५ लाखांहून अधिक मतदार शेतमजुरीचे काम करतात. त्यामुळे राजस्थानात सत्ता कोणाची? याचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती आहे. त्यामुळे या वर्गाच्या मतांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.कर्जबाजारीला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण राजस्थानातही वाढले आहे. त्या रोखण्यासाठी आधी अशोक गेहलोत (२००८) आणि त्यानंतर वसुंधरा राजे (२०१३) यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. वसुंधरा राजे यांनी २०१३ च्या जाहीरनाम्यातून अल्प दरात कृषीकर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र, निवडून आल्यानंतर ती घोषणा हवेतच विरली. त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत.ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पातून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी ८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, या योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही, अशा शेतकºयांनी सरसकट सर्व शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले. सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी शेतकरी नेत्यांना अटक केली. त्यामुळे आंदोलन चिघळले व खवळलेल्या शेतकºयांनी चक्काजाम, रेलरोको केला. त्यावेळेस शेतकºयांच्या भावना लक्षात घेऊन सरकारला कर्जमाफी यादीची फेररचना करावी लागली होती. राजस्थानात सत्तेवर येताच पहिल्या दहा दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. जाहीरनाम्यातूनही याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. वसुंधरा राजे सरकारवर नाराज असलेल्या शेतकºयांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न काँग्रसने केला आहे.कोणताही पक्ष जरी सत्तेवर आला तरी १० दिवसांत संपूर्ण कर्जमाफी देईल का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही निवडणुकांत आलटून पालटून सत्तेवर आलेल्या काँग्रेस, भाजपाने शेतकरी व कष्टकरी वर्गाला मोठमोठी आश्वासने दिली. परंतु त्यापैकी किती पूर्ण केली, हे शेतकºयांना पूर्णपणे ज्ञात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कोणत्या पक्षाच्या बाजूने मतदान करतात, यावरच विद्यमान सरकार टिकते की सत्ताबदल होतो हे ठरेल.>‘गजेंद्रसिंह फॉर्म्युला’ यशस्वी ठरणार का?वसुंधरा राजे सरकारविरोधी भावना असलेल्या शेतकºयांचे मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी अमित शहा यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री तथा राजस्थानचे नेते गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे दिली आहे. गजेंद्रसिंह हे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे संस्थापक सदस्य भैरो सिंह शेखावत यांचे पुत्र आहेत. शेतकरी नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. शिवाय त्यांना मानणारा मोठा वर्गही आहे. एकीकडे वसुंधरा राजे यांच्याविषयी शेतकºयांत तीव्र असंतोष असताना, अमित शहा यांचा गजेंद्रसिंह ‘फॉर्म्युला’ राजस्थानात कितपत यशस्वी ठरतो, याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक