शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

गुरमेहरसाठी गंभीर मैदानात

By admin | Updated: March 2, 2017 04:06 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विचारांनी चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची (डीयू) विद्यार्थिनी गुरमेहर कौरसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात उतरला

नवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विचारांनी चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची (डीयू) विद्यार्थिनी गुरमेहर कौरसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात उतरला आहे, तर कौरची टिंगल केल्याबद्दल टीका सुरू झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागलाही बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. डीयूतील राड्यानंतर गुरमेहरने अभाविपविरुद्ध सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. तिच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यानंतर काहींनी तिला बलात्काराची धमकी दिली होती. शहीद जवानाची मुलगी असलेल्या गुरमेहरच्या विचारांची टिंगल करणे किंवा ट्रोलिंग करणे अत्यंत घृणास्पद होते, असे गंभीरने म्हटले आहे. एआयएसए या संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या दोन जणांना अभाविपने संघटनेतून काढले आहे. त्या दोघांनी पोलिसांसमोरच एआयएसएच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सेहवागनेही तिची टर उडविणारी टिपणी केली होती. मात्र, आता त्याने टिष्ट्वट करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिला तिची मते मांडण्याचा अधिकार आहे. तिला हिंसाचाराची किंवा बलात्काराची धमकी देणारे क्षुद्र आहेत. फोगट भगिनी असतील किंवा गुरमेहर. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहेच, असे टिष्ट्वट सेहवागने केले. आपण एका स्वतंत्र देशात राहतो. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. युद्धात पिता गमावलेली एखादी मुलगी शांतता राहावी या उद्देशाने युद्घाच्या भयानकतेविषयी पोस्ट टाकत असेल, तर तिला तो पूर्ण अधिकार आहे, असे गंभीरने एका निवेदनात म्हटले आहे. कन्हैयाकुमारविरुद्ध पुरावे नाहीतगेल्या वर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केलेले भाषण देशद्रोही होते, असे कोणतेही पुरावे दिल्ली पोलिसांना आढळलेले नाहीत. पोलिसांनीच ही माहिती न्यायालयात दिली आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी कन्हैयाकुमार व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा आरोप ठेवला होता आणि त्यांना काही काळ कोठडीतही ठेवले होते. त्यावेळी त्याला न्यायालयात नेताना भाजपशी संबंधित काही वकिलांनी त्याला मारहाणही केली होती. आता त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप नाहीत, असे पोलिसांनी सांगितल्याने त्याच्या विरोधकांची पंचाईत झाली आहे. >जेएनयू विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्णनिदर्शक विद्यापीठ कॅम्पसमधील प्रशासकीय विभाग बंद पाडत होते, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात केला असताना पोलिसांनी मात्र जेएनयूत विद्यार्थ्यांनी शांततेने आंदोलन केल्याचे न्यायालयात सांगितले. हा विषय न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी प्रशासकीय इमारतीपासून ५० मीटर अंतरावर आंदोलन करीत होते, असे सांगितले. कुलगुरू, शिक्षक आणि जेएनयूचे कर्मचारी कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रशासकीय इमारतीचा वापर करीत होते, असेही पोलिसांनी सांगितले.