शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

गोडसेने नेहरूंना मारायला हवं होतं!

By admin | Updated: October 26, 2014 02:09 IST

‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता.

संघ मुखपत्रतील लेख : संघ नेत्यांनी हात झटकले
नवी दिल्ली/थिरुवनंथपूरम : ‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता. त्यामुळे नथुराम गोडसे याने गांधींऐवजी नेहरूंना गोळ्या घातल्या असत्या तर या देशाचे भले झाले असते,’ असा वादग्रस्त मजकूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मल्याळी मुखपत्र ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पं. जवाहरलाल नेहरू यांचा असा अनादर करणा:या या लेखावर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. याबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द रा.स्व. संघानेही हात झटकत 17 ऑक्टोबर 2क्14 रोजी केरळमध्ये प्रकाशित झालेल्या या वादग्रस्त लेखाचा निषेध केला आहे. या लेखात प्रकाशित झालेली मते पूर्णत: लेखकाची व्यक्तिगत मते आहेत आणि त्या मतांशी आरएसएसला काही देणोघेणो नाही, असे आरएसएसचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनात म्हटले आहे. एका आंदोलनाच्या रूपाने संघाने नेहमीच हिंसक विचार व कृतीची निंदा केली आहे असे सांगून वैद्य यांनी, संघ अशा विचारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 कॉँग्रेसची संघ परिवारावर टीका
4या लेखात पुढे, नेहरू एक स्वार्थी नेते असल्याचा तसेच त्यांनी देशाच्या फाळणीबाबतचे सत्य गांधीजींपासून दडविले असाही उल्लेख आहे. या लेखावर जोरदार आक्षेप घेत केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व्ही.एम. सुधीरन यांनी, संघ परिवाराचा हा इतिहासाची मोडमोड करून नेहरूंना अपमानित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 
 
4नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपाचे उमेदवार राहिलेले भाजपाच्या राज्य समितीचे सदस्य बी. गोपालकृष्णन यांनी हा लेख लिहिला आहे.भाजपाच्या नेत्याने संघाच्या मुखपत्रत लिहिलेल्या या लेखामुळे संघ आणि भाजपा कोणत्या दिशेला जात आहे, हे स्पष्ट होते. भाजपाची विचारसरणी पूर्णत: हिंसाचार आणि द्वेषावर आधारित आहे. समाजाची याच आधारावर विभागणी करणो हा संघाचा हेतू आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग म्हणाले. दरम्यान ‘केसरी’च्या संपादकांनी या लेखाचे समर्थन करताना काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.