शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

५ वेळा नमाज अदा करण्यासाठी ताज महल द्या - मौलानांची मागणी

By admin | Updated: November 21, 2014 18:29 IST

प्रेमाचे प्रतिक अशी ओळख असलेले आग्र्याचा ताजमहल ५ वेळा नमाज अदा करण्यासाठी ताब्यात द्या अशी मागणी लखनऊमधील मौलाना खालीद राशिद फारंगी महेली यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २१ - प्रेमाचे प्रतिक अशी ओळख असलेले आग्र्याचा ताजमहल ५ वेळा नमाज अदा करण्यासाठी ताब्यात द्या अशी मागणी लखनऊमधील मौलाना खालीद राशिद फारंगी महेली यांनी केली आहे. फारंगी यांच्या या मागणीमुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ताजमहल बांधणा-या शाहा जहाँसाठी स्मारकाच्या बाजूला दर शुक्रवारी (जुम्मा) या दिवशी नमाज अदा करण्याची सध्या परवानगी आहे. परंतू दिवसातून पाच वेळेस नमाज पढण्यासाठी परवानगी पाहिजे अशी मागणी लखनऊच्या ऐशबाग ईदगाहचे मौलवी फारंगी महेली यांनी केली आहे. फारंगी हे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी)चे सदस्य आहेत. मुघल काळात प्रेमाचे प्रतिक म्हणून ताज महलची निर्माती करण्यात आली आहे. दरम्यान, ताजमहल आणि त्यामधून होणारी मिळकत ही राज्याच्या वक्फ बोर्डाकडे सोपविण्यात आली पाहिजे, कारण ताजमहलचे स्मारक हे केवळ एक मकबरा आहे. आणि प्रत्येक मकबरा ही वक्फ बोर्डाची मालकी असल्याचे समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी म्हटंले आहे. ताज महल सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाकडे सोपविण्यात यायला हवे, त्या ठिकाणी मुस्लीम अधिकारी नेमून मिळणा-या मिळकतीतून मुस्लीम समाजातील मुलांना शिक्षण घेता यावी यासाठी व्यवस्था करायला हवी, असे आझम खान यांनी सुचविले आहे. 
दरम्यान, ताज महलमध्ये ५ वेळा नमाज अदा करण्याच्या मागणीला भाजपामधील मुस्लीम नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी तीव्र विरोध दर्शविला. ताज महलमध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी मागणे चुकीचे आहे असे सांगतानाच नकवी म्हणाले की, आज ताज महल मागितला, उद्या लाल किला, परवा आणखी कशाची तरी मागणी करण्यात येईल. अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे अब्बास नकवी म्हणाले.  ताज महलची व्यवस्था पाहण्याचे काम सध्या एएसआय अर्थात आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आहे. याठिकाणी दरवर्षी ८० लाखापेक्षा अधिक पर्यटक येत असून दरदिवशी सात ते आठ हजार तिकीट विक्री होते. या तिकीटविक्रीमधून वर्षभरात २५ ते ३० कोटी रूपयांची कमाई होते. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात कमाई होते त्या ठिकाणी केंद्र सरकारने आपला अधिकार ठेवला असून कमी मिळकत असलेले ठिकाण मात्र वक्फ बोर्डाकडे सोपविल्याचा आरोप आझम खान यांनी केला आहे.