शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

गडकरी म्हणाले, चांगले रस्ते हवेत तर, टोल द्यावाच लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:54 IST

लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी त्यांना टोल द्यावाच लागेल, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले

नवी दिल्ली : लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी त्यांना टोल द्यावाच लागेल, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले आणि सरकारकडे पुरेसा पैसा नसल्याने भविष्यात टोल आकारणी करूनच रस्तेबांधणी करावी लागेल, असे स्पष्ट केले.आपल्या मंत्रालयाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला गडकरी उत्तर देत होते. देशाच्या अनेक भागात आकारला जाणारा टोल व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावरून अनेक सदस्यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, ‘टोलका जन्मदाता मै हूँ... टोल जिंदगीभर बंद नही हो सकता... कम ज्यादा हो सकता है.चांगले रस्ते हवे असतील तर टोलशिवाय पर्याय नाही, असे सांगून ते म्हणाले की, ऐपत असलेल्या भागांतून टोलच्या रूपाने जो पैसा मिळतो त्यातून सरकार ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये रस्ते बांधत असते. अर्थव्यवस्थेची भरभराट व्हायला हवी असेल तर देशभर उत्तम रस्ते व महामार्गाचे जाळे विणावे लागेल, यावर भर देताना त्यांनी अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे वचन उद््धृत केले: अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेतील रस्ते उत्तम आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे! शाळांच्या बस व एस.टी. बसना टोलमधून वगळण्याच्या अनेक सदस्यांनी केलेल्या मागणीवर विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.भूसंपादनास होणारा विलंब ही रस्ते बाधण्यातील मोठी अडचण आहे. त्यामुळे राज्यांनी यातून मार्ग काढून मदत करावी, अशी त्यांनी आग्रहपूर्वक विनंती केली.>उत्तरातील ठळक मुद्देगेल्या पाच वर्षांत ४० हजार किमी लांबीच्या महामार्गांची बांधणी पूर्ण.पहिले मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा ३.८५ लाख कोटी रुपये खर्चाची महामार्ग बांधणीची ४०३ कामे रखडली होती. त्यातील ९० टक्के कामे धडाक्यात सुरु झाल्याने बँकांची तीन लाख कोटी रुपयांची कर्जे बुडणे वाचले.देशात २५ लाख ड्रायव्हरची टंचाई आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ड्रायव्हिंग स्कूल सुरु केले जाईल.एप्रिल २०२० पासून विकली जाणारी सर्व वाहने ‘यूरो ६’ प्रदूषण निकषांची पूर्तता करणारी असतील.>दिल्ली-मुंबई‘ग्रीन एक्स्पेस-वे’दिल्ली व मुंबई दरम्यान नवा ‘ग्रीन एक्स्प्रेस-वे’ बांधला जाणार आहे, असेही गडकरींनी सांगितले. यामुळे हा प्रवास १२ तासांत शक्य होईल. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रतील अत्यंत मागास व आदिवासी भागांतून हा महामार्ग जाणार असल्याने भूसंपादनाचा सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा खर्च वाचेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी