शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

गडकरी म्हणाले, चांगले रस्ते हवेत तर, टोल द्यावाच लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:54 IST

लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी त्यांना टोल द्यावाच लागेल, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले

नवी दिल्ली : लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी त्यांना टोल द्यावाच लागेल, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले आणि सरकारकडे पुरेसा पैसा नसल्याने भविष्यात टोल आकारणी करूनच रस्तेबांधणी करावी लागेल, असे स्पष्ट केले.आपल्या मंत्रालयाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला गडकरी उत्तर देत होते. देशाच्या अनेक भागात आकारला जाणारा टोल व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावरून अनेक सदस्यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, ‘टोलका जन्मदाता मै हूँ... टोल जिंदगीभर बंद नही हो सकता... कम ज्यादा हो सकता है.चांगले रस्ते हवे असतील तर टोलशिवाय पर्याय नाही, असे सांगून ते म्हणाले की, ऐपत असलेल्या भागांतून टोलच्या रूपाने जो पैसा मिळतो त्यातून सरकार ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये रस्ते बांधत असते. अर्थव्यवस्थेची भरभराट व्हायला हवी असेल तर देशभर उत्तम रस्ते व महामार्गाचे जाळे विणावे लागेल, यावर भर देताना त्यांनी अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे वचन उद््धृत केले: अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेतील रस्ते उत्तम आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे! शाळांच्या बस व एस.टी. बसना टोलमधून वगळण्याच्या अनेक सदस्यांनी केलेल्या मागणीवर विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.भूसंपादनास होणारा विलंब ही रस्ते बाधण्यातील मोठी अडचण आहे. त्यामुळे राज्यांनी यातून मार्ग काढून मदत करावी, अशी त्यांनी आग्रहपूर्वक विनंती केली.>उत्तरातील ठळक मुद्देगेल्या पाच वर्षांत ४० हजार किमी लांबीच्या महामार्गांची बांधणी पूर्ण.पहिले मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा ३.८५ लाख कोटी रुपये खर्चाची महामार्ग बांधणीची ४०३ कामे रखडली होती. त्यातील ९० टक्के कामे धडाक्यात सुरु झाल्याने बँकांची तीन लाख कोटी रुपयांची कर्जे बुडणे वाचले.देशात २५ लाख ड्रायव्हरची टंचाई आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ड्रायव्हिंग स्कूल सुरु केले जाईल.एप्रिल २०२० पासून विकली जाणारी सर्व वाहने ‘यूरो ६’ प्रदूषण निकषांची पूर्तता करणारी असतील.>दिल्ली-मुंबई‘ग्रीन एक्स्पेस-वे’दिल्ली व मुंबई दरम्यान नवा ‘ग्रीन एक्स्प्रेस-वे’ बांधला जाणार आहे, असेही गडकरींनी सांगितले. यामुळे हा प्रवास १२ तासांत शक्य होईल. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रतील अत्यंत मागास व आदिवासी भागांतून हा महामार्ग जाणार असल्याने भूसंपादनाचा सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा खर्च वाचेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी