शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील संकटावर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:19 IST

Fuel Crisis : समितीत कोणाचा समावेश? नेमकं काय करणार? जाणून घ्या...

Fuel Crisis : मध्यपूर्वेतील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यीय उच्चस्तरीय मंत्रीगटाची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील. संभाव्य ऊर्जा संकटाचा भारतावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी हा मंत्रीगट विविध स्तरांवर परिस्थितीचे परीक्षण करणार आहे. 

दरम्यान, सरकारकडून सध्या देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर कोणताही मोठा परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही संभाव्य अडचणींचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे.

समितीत कोणते मंत्री?

या मंत्रीगटात गृहमंत्री अमित शहा यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती आणि कूटनीतिक घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. तर पेट्रोलियम मंत्रालय जागतिक तेल आणि गॅस पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणार आहे. विशेषतः एलपीजी पुरवठ्यावर संभाव्य ताण निर्माण झाल्यास पर्यायी स्रोत आणि पुरवठा व्यवस्थापनाच्या पर्यायांवरही विचार केला जात आहे.

एलपीजी तुटवड्याच्या बातम्यांवर सरकार सतर्क

देशातील काही भागांत एलपीजी सिलेंडरची कमतरता जाणवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती ग्राहकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे. तेल कंपन्यांना पुरेसा साठा ठेवण्याचे आणि वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा मंत्रीगट इतर मंत्रालयांसोबत समन्वय साधून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेणार आहे, जेणेकरून देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर कमीत कमी परिणाम होईल.

होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना मार्ग

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाची यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. या चर्चेनंतर इराणने भारतीय जहाजांना होर्मुझमार्गे प्रवास करण्याची परवानगी दिली. बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत भारताचे दोन तेलवाहू जहाज या मार्गाने सुरक्षितपणे पुढे जात आहेत. युद्धानंतर या मार्गावरील जहाजवाहतूक जवळपास ठप्प झाली होती. त्यामुळे या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

गॅस एजन्सींसमोर नागरिकांची गर्दी

दरम्यान, दिल्ली, मुंबई, लखनौ आणि भोपाळ सारख्या मोठ्या शहरांमध्ये गॅस एजन्सींसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. मिडल ईस्टमधील युद्धामुळे भविष्यात गॅस पुरवठा कमी होईल किंवा किंमती वाढतील, या भीतीमुळे अनेक नागरिक आधीच सिलेंडर बुक करत असल्याचे दिसून येत आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका : सरकारचे आवाहन

केंद्र सरकारने मात्र या सर्व भीतीला फेटाळून लावत देशात तेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील पुरवठा साखळी सुरळीत असून घरगुती ग्राहकांना गॅस पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून अतिरिक्त बुकिंग टाळण्याचे आवाहन केले आहे. देशाची ऊर्जा पुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वासही सरकारने व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India on Alert: Panel Formed to Tackle Middle East Crisis Impact

Web Summary : Amidst Middle East tensions, India establishes a high-level committee headed by Amit Shah to monitor and mitigate potential energy crisis effects. Essential supplies remain stable, but the government urges citizens to avoid panic booking of LPG cylinders, ensuring energy security.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईAmit Shahअमित शाहIranइराणIsraelइस्रायल