अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:50 IST2026-01-09T13:46:18+5:302026-01-09T13:50:35+5:30

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची माहिती.

Free treatment up to Rs 1.5 lakh for accident victims; Modi government is bringing a new scheme | अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना

अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना

नवी दिल्ली: देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून व्हेइकल टू व्हेइकल (V2V) संवाद तंत्रज्ञान आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहनांना एकमेकांशी थेट संवाद साधता येणार असून, अपघात होण्याआधीच चालकांना धोक्याचा इशारा मिळणार आहे.

V2V तंत्रज्ञान कसे काम करेल?

V2V (Vehicle-to-Vehicle) संवाद प्रणालीमुळे आसपासच्या वाहनांचा वेग, स्थान, ब्रेकिंग, अचानक दिसणारे अडथळे किंवा ब्लाइंड स्पॉटवर वाहन चालकांना रिअल-टाइम अलर्ट मिळेल. त्यामुळे चालक वेळीच योग्य निर्णय घेऊ शकतील आणि अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. या उद्देशाने दूरसंचार विभागासोबत संयुक्त कार्यदल स्थापन करण्यात आला असून, V2V संवादासाठी 5.875 ते 5.905 GHz दरम्यानचा 30 MHz स्पेक्ट्रम वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

गडकरी यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार लवकरच रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार आहेत. या योजनेंतर्गत अपघातग्रस्तांना किमान सात दिवसांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

‘राहवीर’ योजनेत मदत करणाऱ्याला सन्मान

कोणत्याही रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला सरकारकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अशा मदत करणाऱ्या नागरिकांना ‘राहवीर’ असे संबोधले जाईल. ही योजना उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडसह काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून यशस्वीपणे राबवण्यात आली आहे.

देशातील अपघातांची गंभीर स्थिती

गडकरी यांनी सांगितले की, देशात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये जवळपास 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील सुमारे 66 टक्के मृत्यू 18 ते 34 वयोगटातील तरुणांचे आहेत.

मोटार वाहन कायद्यात मोठे बदल प्रस्तावित

सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोटार वाहन अधिनियमात 61 सुधारणा सुचवणार आहे. यामागील उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

रस्ते सुरक्षेत सुधारणा

कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक करणे

नागरिक सेवांचा दर्जा उंचावणे

व्यवसाय सुलभता वाढवणे

जागतिक मानकांशी सुसंगत नियम तयार करणे

बैठकीत इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्लीत झालेल्या परिवहन विकास परिषदेच्या 43व्या बैठकीत बस व प्रवासी वाहनांसाठी सुधारित सुरक्षा मानके, बस बॉडी कोड, BNCAP सुरक्षा रेटिंग, टप्प्याटप्प्याने ADAS (Advanced Driver Assistance System) लागू करणे, तसेच वाहतूक नियमभंगासाठी डिमेरिट व मेरिट पॉइंट सिस्टीम लागू करण्यावरही चर्चा झाली. याशिवाय ठराविक वजनापर्यंतच्या मालवाहू वाहनांसाठी डिजिटल व स्वयंचलित परवाना प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.

Web Title : दुर्घटना पीड़ितों का मुफ्त इलाज, मददगारों को ₹25 हजार: नई योजना

Web Summary : दुर्घटना पीड़ितों के लिए सरकार मुफ्त इलाज शुरू करेगी, मददगारों को ₹25,000 का इनाम। वी2वी तकनीक चालकों को सतर्क करेगी, जिससे दुर्घटनाएँ कम होंगी। मोटर वाहन अधिनियम में संशोधन किया जाएगा।

Web Title : Free treatment for accident victims, ₹25K reward for helpers: New scheme

Web Summary : Govt to launch cashless treatment for accident victims, rewarding helpers ₹25,000. V2V tech will alert drivers, reducing accidents. Motor vehicle act to be amended.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.