शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

Corona : इराणमधून पुन्हा ५3 भारतीय स्वदेशी परतले, आतापर्यंत ३८९ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 10:44 IST

इराणमधून ५३ भारतीयांचा चौथा जथ्था भारतात परतला आहे. या ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.

ठळक मुद्देइराणमधून थेट राजस्थानातील जैसलमेर विमानतळावर पोहोचले हे भारतीयरविवारी 230 भारतीयांची इराणमधून करण्यात आली होती सुटका इराणमधील भारतीय दुतावासाचे आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांचेही जयशंकर यांनी आभार मानले आहेत.

नवी दिल्ली -कोरोना व्हायरसने इराणमध्येही धुमाकूळ घालता आहे. येथे कोरोनोच्या सावटाखाली आडकलेल्या तब्बल 53 भारतीय नागरिकांचा जथ्था सोमवारी स्वदेशी परतला. याच बरोबर इराणमधून सुटका झालेल्या भारतीय नागरिकांची संख्या आता 389 झाली आहे. यापूर्वी रविवारी 230 भारतीय नागरिकांची इराणमधून सुटका करण्यात आली होती, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.

जयशंकर म्हणाले, 'इराणमधून ५३ भारतीयांचा चौथा जथ्था भारतात परतला आहे. या ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. इराणची राजधानी तेहरान आणि शिराज या शहरांमधून यांची सुटका करण्यात आली. इराणमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची संख्या आता ३८९ झाली आहे.' या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या इराणमधील भारतीय दुतावासाचे आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांचेही जयशंकर यांनी आभार मानले आहेत.

इराणमधून थेट राजस्थानातील जैसलमेर विमानतळावर पोहोचलेल्या या ५३ नागरिकांना येथील आर्मी वेलनेस सेंटरमध्ये नेण्यात आले. येते त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोना ग्रस्तांची दोशातील आकडेवारी अशी -महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. याशिवाय केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात 13, दिल्लीत 7, कर्नाटकात 6, तेलंगानामध्ये 3, लद्दाखमध्ये 3, राजस्थानमध्ये 2, जम्मू काश्मीरमध्ये 2, तामिळनाडू, पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढूळन आले आहेत. 

याच बरोबर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 17 परदेशी नागरिकांपैकी 14 जणांना हरियाणा, 2 जणांना राजस्थान आणि एकाला  उत्तर प्रदेशात ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आता 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIranइराणIndiaभारत