शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ममतांच्या गडाला पुन्हा एकदा मोठं खिंडार?; तृणमूलचे चार बडे नेते आज हाती घेऊ शकतात भाजपचा भगवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:10 IST

हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सातत्याने धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे चार बडे नेते आज नवी दिल्ली येथे भाजपचा भगवा हाती घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही नेते एका विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. 

यात, नुकताच राजीनामा दिलेले, माजी मंत्री राजीब बॅनर्जी, आमदार तथा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची मुलगी वैशाली दालमिया, आमदार प्रबीर घोषाल आणि हावडा नगरपालिकेचे माजी महापौर रथीन चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

राजधानी दिल्लीत शुक्रवारी इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आपला दोन दिवसीय बंगाल दौरा रद्द केला आहे. 30 आणि 31 जानेवारीला शाह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे अनेक   हेवी वेट नेते भाजपत सामील होण्याची चर्चा होती. मात्र शाह यांचा बंगाल दौरा रद्द झाल्याने हे चारही नेते विमानाने दिल्लीला जात असल्याचे वृत्त आहे.

"बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही", ममता बॅनर्जी संतापल्या

हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जींना धक्का देत नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. भाजपा मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भट्टाचार्य यांचे स्वागत करण्यात आले.

आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत!

यावेळी, "आज बंगालमधील तरूण बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहेत. तरुणांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. बंगालमध्ये ममता सरकारकडे कोणतेही व्हिजन नाही. तसेच भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच आता मी आत्मनिर्भर बंगाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारधारेसोबत काम करणार आहे," असे म्हणज अरिंदम भट्टाचार्य यांनी त्यावेळी ममतांवर निशाणा साधला होता.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाdelhiदिल्लीAmit Shahअमित शहा